स्वराज्यसूर्य शिवराय - 9

(21)
  • 6.1k
  • 4
  • 2.5k

बंड! होय बंड! शिवरायांनी जे स्वराज्य स्थापनेचे प्रयत्न सुरू केले होते, हक्काची लढाई सुरू केली होती ती आदिलशाहीच्या दृष्टीने एक प्रकारचे बंडच होते. सुरुवातीला आदिलशाही दरबारी ज्या तक्रारी जात होत्या तिकडे दरबाराने 'उनाड पोरासोरांचे उद्योग' म्हणून कानाडोळा केला. परंतु शिवरायांची घोडदौड थांबत नव्हती ते एकामागून एका किल्ल्यावर भगवे निशाण फडकवत होते. आदिलशाहीकडे रोज नवनव्या तक्रारी येत होत्या. आदिलशाहा गंभीर झाला. ह्या पोराचे बंड मोडून काढण्यासाठी काय करावे या विचारात तो असताना त्याने शहाजीराजांना जाब विचारला. राजेही विचारात पडले, काय उत्तर द्यावे. शेवटी शहाजी राजेंनी उत्तर पाठवले,