स्वराज्यसूर्य शिवराय - 16

(16)
  • 4.7k
  • 3
  • 2k

शहाजीराजांच्या आकस्मिक निधनानंतर जिजाऊंचे मन सती जाण्यापासून वळविण्यात शिवराय यशस्वी झाले. सर्वांनीच सुटकेचा श्वास घेतला. जिजाऊंशिवाय स्वराज्य स्थापन करण्याची घोडदौड चालू ठेवण्याची कल्पनाच शिवराय सहन करू शकत नव्हते. शहाजी राजे ....शिवरायांचे वडील अचानक गेले. त्या जबरदस्त अशा धक्क्यातून शिवराय हळूहळू सावरले. दुःख करत बसायला वेळ तरी कुठे होता? शिवरायांनी पुन्हा स्वराज्याकडे लक्ष केंद्रित केले. मुधोळ, कुडाळ हे विजय आणि कोकणातील एका बेटावर सिंधुदुर्गसारख्या बळकट किल्ल्याची बांधणी करण्या- सोबतच वेंगुर्ल्याची मोहिम अशा काही यशस्वी मोहिमा शिवरायांनी पूर्ण केल्या.…