विनाशकाल २०८०- वाचवा आपल्या ग्रहाला

  • 5.4k
  • 1
  • 1.6k

दोन हजार ऐंशी - पृथ्वीवर सर्वत्र रोबोट दिसत आहेत. जगाची मानवी लोकसंख्या दहा बिलियन आणि भारताची लोकसंख्या दोन बिलियन. आता हा विचार नक्की मनात आला असेल की, एवढ्या दशकात लोकसंख्या दहा लाखच कशीकाय? दोन हजार पन्नासच्या आसपासाच्या काळी, जगाची लोकसंख्या जवळजवळ अठरा ते वीस बिलियन पर्यंत पोहोचलेली होती. पण तेवढ्या जनतेला अन्नाचा खूप तुटवता होत होता. सर्वत्र दंगली, मारपिट, गुन्हेगारी वाढतच होती. तेव्हा फक्त दोन वेळचं जेवण मिळविण्यास माराहानी होत होती. ज्याची शक्ती जास्त तोच ह्या लढाईत जिंकायचा आणि त्यालाच पोटभर जेवण मिळायचं. काही लोकांना मिळायचं तर काही लोक भुकेच झोपी जायचे. सर्वांनी आपापल्या नोकऱ्या सोडलेल्या होत्या. सारे लोक शेतीकडे