वा.रा.कान्त

  • 8.8k
  • 2.2k

जीवनातील अनंत शक्यतांना सहजपणे व्यक्त करणारे , शब्द आणि अर्थाचे क्षितीज गाठणारे, अव्यक्त भावनांची शब्दात उधळण करणारा अतिसंवेदनशील तरीही ’अग्निसांप्रदायिक" ठरलेले नवकाव्याच्या प्रवासातील एक विलक्षण काव्यप्रतिभा म्हणजे कविवर्य़ वा.रा.कान्त. कान्त यांचा काव्यप्रवास कवी पार्थिव अर्थात द.का.कुलकर्णी आणि कवी कृष्णाकुमार यांच्यासह "पहाटतारा(सन१९३०) या काव्यसंग्रहाने सुरु झाला. फटत्कार(१९३३) हा कान्त यांचा तत्कालीन गाजलेला काव्यसंग्रह." नेत्रानलि करुनी त्रैलोक्याची होळीअन्याय असमता रगडता पायाखालीकर ताअंडव रुद्रा विराट विश्वचिंतेत" या ओळी कान्तांच्या रुद्रवीणा(सन१९४७) या काव्यसंग्रहातील "रुद्रास" या रचनेतील आहे. स्वातंत्र्यसंग्रामाचा परिणाम अनेक साहित्यिकांवर झाला. कान्त यांच्या काव्याचा स्वभाव व वृत्ती अतिशय दाहक आणि उग्र होती. या काव्यगुणांमुळेच त्यांना "अग्निसांप्रदायिक" म्हणून संबोधिल्या गेले. कान्त यांच्या प्रदीर्घ काव्याप्रवासातील