क्षत्रिय प्रेम (युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं) - 1

  • 6.1k
  • 1.7k

(सदरची कथा हि पूर्णपणे काल्पनिक आहे.) भाग : पहिला आजपर्यंत भारताच्या या पवित्र भूमीवर असंख्य युद्धे झाली. प्रत्येक युद्धाची कारणं वेगवेळी होती. कुणाला आपलं साम्राज्य वाढवायचं होतं. तर कुणाला आपलं वर्चस्व सिद्ध करायचं होतं. कुणाला अन्याया विरुद्ध आवाज उठवायचा होता तर कुणाला जगण्याचं स्वातंत्र्य मिळवायचं होतं. भारताच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे मिळतील कि ती युद्धे त्यांच्या परिणामामुळे आठवणीत राहतील. असच एक युद्ध म्हणजे महाभारत... धर्माने अधर्माला संपवण्यासाठी केलेलं सर्वविनाशी युद्ध. महाभारताची व्याप्ती इतकी मोठी होती की इतिहासाला त्याची दखल घेणं भागच पडलं. पण महाभारताच्या काळात आणखीन एक युद्ध लढलं गेलं. आपलं प्रेम मिळवण्यासाठी झालेलं हे