नवनाथ महात्म्य भाग २० - अंतिम पार्ट

  • 11.1k
  • 1
  • 3.9k

नवनाथ महात्म्य भाग २० समारोप ====== महाराष्ट्रात अनेक संत महात्मे होऊन गेले. कित्येक पंथ या पवित्र भूमीत उदयाला आले. याच संतांच्या भूमीत एक पंथ उदयाला आला आणि तो म्हणजे नाथपंथ. नाथपंथाची स्थापना साधारणपणे आठव्या शतकात गुरु दत्तात्रेय यांच्या कृपाशीर्वादाने झाली. असे म्हणतात कि भगवान शंकरांनी ह्या पंथाची स्थापना केली. मच्छिंद्रनाथ हे या नाथपंथातील पहिले नाथ. त्यानंतर गोरक्षनाथ आणि मग कानिफनाथ असा या पंथाचा उदय होत गेला आणि एकूण नऊ नाथ आता पर्यंत झालेले आहेत. ज्यांच्या कथा आणि चमत्कार आपण वाचलेत . नाथ संप्रदायी योग्यांचा एक विशिष्ट वेश असतो. मलिक मुहंमद जायसी, मीरा, सूरदास, कबीर, अरब पर्यटक इब्‍न बतूता इत्यादींनी या