विभाजन - 7

  • 6.4k
  • 2.5k

विभाजन (कादंबरी) (7) धुळ्यात प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रँड याने जुलूम जबरदस्ती केली. त्याचा बदला म्हणून दामोदर व बाळकृष्ण चापेकर बंधूंनी २२ जून १८९७ रोजी रँडचा वध केला. दामोदर, बाळकृष्ण व वासुदेव तीन बंधू व त्यांचे सहकारी महादेव रानडे यांना फाशी झाली. एकाच घरातील तीन भावांनी देशसेवेसाठी होतात्म पत्करले. याच सुमारास बिहारमधील मुंडा आदिवासींनी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरुद्ध फार मोठा उठाव केला. १९०० मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे मित्रमेळा ही क्रांतिकारकाची गुप्त संघटना स्थापन केली. १९०४ साली या संघटनेला अभिनव भारत असे नाव देण्यात आले. उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने सावरकर इंग्लंडला गेले. तेथून