श्राद्ध करण्याची गरजच नाही!

  • 11.9k
  • 3.2k

26. श्राद्ध करण्याची गरजच नाही! काव काव ये म्हणत पितृपक्षाचे या महिण्यात लोकं कावळ्याला बोलावत असतात. कावळा येईल व आपण बनविलेल्या पिंडाला शिवून जाईल. मग कावळ्यानं पिंडाला शिवलं की आपल्या पितरांना मोक्ष मिळेल व आपले पितर आशीर्वाद देतील ही त्या मागील भावना. आता पिंड बनवितात. तेही पीठाचं. जे कावळ्याचं खाद्य असतं. तसेच ते खाद्य कावळ्यांना आवडतं. या पृथ्वीवर या देशात रुजलेल्या संस्कृतीनुसार कावळ्याला यमाचा दूत समजण्यात येवून तर्पण केलं जात. लोकांना वाटतं की आमचा संदेश हा कावळ्याच्या माध्यमातून आमच्या पितरांपर्यंत जातो. आत्मा असतो. तो दिसत नसला तरी शाश्वत आहे. अमर आहे. जर या मेलेल्या माणसांचं तर्पण केलं नाही किंवा पितृपक्षात