अधांतर - ८

  • 6.4k
  • 2.6k

चेहरे के रंग से अगर, इंसांन पहचान लेते। उम्मीद की कश्ती, कही डुबने ना देते। आपल्याला आयुष्यात माणसं कशी जोडायची हे जास्त शिकवल्या जातं, पण माणसं ओळखायची कशी हे तर आपण आपल्याला आलेल्या अनुभवावरून शिकतो...पण जर माणसं ओळखायला शिकलो असतो तर वाईट परिस्थितीतुन गेलो ही नसतो, आणि वाईट परिस्तिथी अनुभवली नसती तर आयुष्य आपल्याला काय देतंय हे कळाल नसतं...कसा आहे ना मनुष्य स्वभाव पण! ज्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतो तोच सगळ्यात जास्त बेजबाबदार पणे वागतो आपल्यासोबत...ज्याला जास्त जीव लावतो तोच आपली पर्वा करत नाही, आणि तीच व्यक्ती आपला जास्त अपेक्षाभंग करते...की असं म्हणायचं, आपण तसे अधिकार देतो त्या व्यक्तीला आपल्याला दुखवायला....असंही