शिवाजी महाराज एक उत्तम शिक्षक आणि प्रशिक्षक होते... - भाग ६

  • 6.1k
  • 1
  • 3.3k

शिवाजी महाराज अध्यात्मिक वृत्तीचे होते. अध्यात्माचे अधिष्ठान त्यांच्या राज्यात महाराष्ट्रात स्थिरस्थावर झाले होते. तरीसुद्धा परकीयाकडून मंदिरे लुटली जात होती .मंदिरे पाडली जात होती. पूजा बंदी होती .उत्सव बंदी होती .अशा अनेक घटना या काळात घडत होत्या त्याचा शिवाजीमहाराजांच्या मनावर खूपच परिणाम होत होता. स्वराज्याचे परकीय शत्रू म्हणजे इराणी, पठाण , मुस्लिम , इंग्रज होते. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या दरबारात प्रवेश करणाऱ्या मावळ्यांच्या रूपात पक्के गुप्तहेर खाते तयार केले होते. याचा अर्थ औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराजांचे असंख्य गुप्तहेर होते. त्यामुळे तिकडची माहिती इकडे महाराष्ट्रात लगेच कळत होती. राजांनी सैनिकांमध्ये, मावळ्यामध्ये समानतेचे तत्व ठेवले होते. त्यांच्याशी जिवाभावाची मैत्री निर्माण केली होती. त्यामुळे एकोपा वाढायला