अधांतर - २४

  • 7.3k
  • 1
  • 2.5k

"या तो हम ज्यादा ही सिधे थे, या किस्मत की मक्कारी थी। हर बार तुमसे धोका खाया, सच की हर उम्मीद हारी थी।" चांगुलपणाच्या कितीही गोष्टी केल्या आणि चांगुलपणावर माझा कितीही विश्वास असला तरी या कलयुगात एक गोष्ट नक्कीच अनुसरण करावी, ती म्हणजे "जशास तसे वागणे" ....हो, अगदी खरं बोलते मी, कारण अतिजास्त सरळ चालण्याने धर्मराज युधिष्ठिर आपलं सगळंच गमावून बसले होते...बरं तेंव्हा त्यांना सगळं मिळवून द्यायला आणि त्यांना मार्गदर्शन करायला साक्षात लीलाधर तिथे होते, पण आता तस नाही ना..!! आताच्या काळात कोणी येत नाही मार्गदर्शन करायला, आणि तसा मार्गदर्शक भेटायला नशिबही लागतं... आणि नुसतं नशीब तसं असून चालत नाही,