सांग ना रे मना (भाग 25)

  • 4.3k
  • 2.1k

मग संयु ने मीतेश पासून कायमचे दूर जाण्याचा निर्णय घेतला . इथे राहिले तर मी मीतेश ला कधीच विसरु शकणार नाही.असा निर्णय तिने घेतला.दुसऱ्या दिवशी संयु पल्लवी कडे आली.तिचे सुजलेले डोळे बघुनच पल्लू काय ते समजली. संयु तू ठीक आहेस ना? हो पल्लू मी काल मीतेश ला भेटले. मला माहित आहे संयु. म्हणजे तुला आरोही शुद्धिवर आली आहे हे माहित होत? हो काल निनाद ने मला सांगितले पन तुझ्याशी मितेशच बोलू दे म्हणून मी गप्प राहिले. ओके पल्लू मी एक निर्णय घेतला आहे. कोणता? मी पुणे सोडून जाणार आहे कुठे जाणार हे अजुन नाही ठरवले. संयु वेडी आहेस का तू?