निर्णय. - भाग १५

  • 5.4k
  • 2.5k

निर्णय भाग १५मागील भागावरून पुढे…मिहीरच्या लग्नानंतर सहज म्हणून शरद आणि प्रज्ञा भेटायला घरी आले होते. मिहीरच्या लग्नाच्या वेळी मंगेश शरदशी खूप वेडंवाकडं काही बोलला नाही म्हणून शरदला वाटलं की मंगेशचा स्वभाव आता बदलला असेल म्हणून ती दोघं घरी आली. कितीतरी वर्ष झाली म्हणजे शरदचं लग्न झालं आणि तो वेगळा राहू लागला. मंगेशचं विचीत्र वागणं सतत काहीही कारण नसताना शरदला प्रज्ञाला, इंदिरेला टोमणे मारणं चालू असायचं.इंदिरा शांत असायची पण प्रज्ञा कशी शांत राहील? त्रास सहन करण्याची एक मर्यादा असते. गंम्मत म्हणून बोलताना भान राखलं पाहिजे हे मंगेशला कधी कळलंच नाही. म्हणूनच शरद वेगळा राहू लागला. शरदकाका मिहीर आणि मेघना चे लाडके