आल्या पावली परत गेला

  • 5.3k
  • 1.9k

आल्या पावली परत गेला!माणिकने बारावीची परीक्षा दिली. ती सुट्टीत मामाकडे गेली होती. तिथे मामीच्या भावासोबत त्याचा मित्र जगन आला होता. जगन बीए होता. त्याला माणिक पसंत पडली. जगनने मामीजवळ माणिकचा विषय काढला. म्हणाला,कोल्हापूरला आमचं घर आहे. चादरींच दुकान आहे. आईवडील थोरला भाऊ नि दोन बहिणी आहेत. मामाने माणिकच्या आईवडिलांना बोलावून घेतलं. जगनचे आईवडील आले. ठराव झाला नि ग्रीष्मात माणिक नि जगनचं लग्न झालं. जगनने माणिकला पुढे शिकू देईन असं आश्वासन दिलेलं खरं पण घरात दहा कामं रांगेत तिची वाट बघत असायची. नणंदा कॉलेजला जायच्या. सकाळी उठल्यापासनं अंगण झाडणं,नाश्ता करणं,भांडी घासणं अशी कामाची लाइन लागलेली असायची त्यात थोरला दिर व त्याची