मल्ल प्रेमयुद्ध - भाग 25

  • 5.3k
  • 1
  • 3.7k

मल्ल प्रेमयुध्द वीर घरी आला, तेव्हा आबा नोकरांना कोणाला किती गोण्या द्यायच्या कशाच्या गोण्या द्यायच्या हे सगळे सांगत होते.वीर आत मध्ये आला आणि विचारले, "आबा हे काय करताय?"तेव्हा आबांनी सांगितले, "अरे कांद आलेत, ज्वारी, तांदूळ हायत म्हंटलं दोन्ही सुनांच्या घरी पाठवून...आता तसं काय मोठ्या सूनच्या घरी काय कमी न्हाय पण तरीपण पाठवाव दरवर्षाला आपण पाठवतो. तर यंदा क्रांती च्या घरी पण पाठवाव. दहा पाच पोती भरतील. एवढी पाठवून देतो." "दादाना फोन करून आधी विचारात्यांना पटणार हायका, ती माणसं साधी त्यांना हय पटल की नाही मला जरा शंका हाय, तरीपण फोन करा एकदा विचारा." वीर म्हणाला.आबा म्हणाले मी पाठवलं म्हंटल्यावर ते