लग्न

  • 5.2k
  • 1.9k

लग्न ही अशी गोष्ट आहे, जी करणारा ही पस्तावतो आणि न करणाराही पस्तावतो. लग्न केल्यावर बऱ्याच जणांना वाटते की आपण लग्नाची उगीच घाई केली,थोड थांबलो असतो तर बरं झालं असतं.आणि ज्याच लग्न होत नाही तो लग्न झालेल्यांच्या उगीच हेवा करत बसतो.लग्न म्हणजे जर एक मोठ्ठी बाग असं जर आपण समजलो तर त्या बागेत फुलं येतील, तसेच काटे पण येतील, खाचखळगे,दगडधोंडे,साप,विषारी, औषधी वनस्पती सुद्धा येतील, पण ह्या सगळ्यांचा अनुभव त्या बागेत आल्यावरच आपल्याला होईल.लग्न न झालेले जे लोकं हे अशा खिडकीत उभे असतात ज्यातून त्यांना फक्त बागेचा फुलं असलेलाच भाग दिसतो त्यामुळे लग्न न केल्याचा त्यांना पश्चाताप होतो आणि एकदा त्यांचं