मैत्रिणी

  • 3.9k
  • 1
  • 1.2k

आज बिल्वा फार आनंदात आहे कारण आज ती व तिच्या कॉलेज च्या तीन मैत्रिणी तिच्याकडे भेटणार आहेत. कॉलेज चं शिक्षण संपल्यावर एक दोन वर्षांच्या फरकाने चौघींचेही लग्न झाले. लग्नानंतर चौघीही पुण्यातच असतात पण संसाराच्या धबडग्यात एकमेकींना भेटणे दुरापास्तच झाले, पण ते काही नाही आज वेळात वेळ काढून भेटायचंच असं त्यांनी ठरवलं. बिल्वा चा नवरा कामा निमित्य बाहेरगावी गेल्यामुळे तिचं घर रिकामं च होतं म्हणून तिनेच म्हंटल तिच्याच घरी भेटू म्हणून, आणि चांगलं दोन दिवस राहायलाच या असं तिघींनाही सांगितले. आजचा शुक्रवार, आज संध्याकाळी आल्या की रविवारी संध्याकाळी च आपापल्या घरी जातील. ते पहा इजा आलीच,तिच्या मागून तिजा पण आली. इजा