मात - भाग ११

  • 3.7k
  • 1.7k

रेवतीने त्याला घरी सोडले. डॉक्टर काय म्हणाले ते सुहासच्या आई-बाबांच्या कानी घातले. सुहासच्या आईने देवा समोर साखर ठेवली.सुहास दोन दिवसांनी परत डॉक्टरांकडे गेला... गोळ्यांनाही त्याचे शरीर चांगला प्रतिसाद देत होते. डॉक्टरांच्या कृतींमधूनही आता खूप सकारात्मकता जाणवत होती. डॉक्टरांनी त्याला आता पुढील तीन महिन्याचा आराखडा लिहून दिला. गोळ्या, औषधे, पथ्य-पाणी आणि डॉक्टरांना भेटण्याच्या वेळा...सर्व ठरल्याप्रमाणे चालले होते. अडीच महिन्यात सुहासने तब्बेत सुधारण्या बाबत बरीचशी प्रगती दाखविली... डॉक्टरांनी तो सर्व आराखडा अजुन १ महिना राबवला...१ महिन्यात परत जवळ जवळ पूर्ववत होणाच्या कक्षेत आलेल्या सुहासला त्रास होऊ लागला... डॉक्टरांनाही अचानक काय झाले याचा अंदाज येईना...सुहासची तब्बेत आता वरचेवर खालावत चालली होती... त्याला अंथरुणावरून