मानवता जपूया

  • 1.4k
  • 546

मानवता जपुया अंकुश शिंगाडे ९३७३३५९४५० मानवता जपुया म्हणत सगळी जनमाणसं कामाला लागतात.कार्य करतात.सुरुवातीला त्यांचं कार्य सामाजिक असतं.परोपकार असतो.पण जसजसे दिवस जातात.तसतसा त्यांच्यात बदल होतो.त्यांच्यात पुढे मानसिक विकृती निर्माण होत असते.स्वार्थी वासनांध नजर,ही त्यांच्यात शिरते.सामाजिकतेच्या पैलुला छेडले जाते.ह्या पैलुंना एका बाजुला ठेवुन निरपेक्ष निःस्वार्थ सामाजिकतेची जागा ही स्वार्थीपणाने घेते.मग याच सामाजिकतेतुन पुढे पैशाला महत्व येते. पैसा जरी महत्वाचा नसला समाजसेवेपुढे.....तरी समाजसेवा विणा पैशाने होत नाही असं वदणारी मंडळी आजच्या काळात कमी नाही.खरं तर ज्या साधु संतांवर आपण विश्वास ठेवतो.तेच साधु आजच्या काळात कसे वागत होते.हे राम रहीम,आसाराम,राधे माँ इत्यादी सर्वांकडुन दिसुन येते.एवढेच नाही तर नर्मदा बचाव साठी आमरण उपोषण करणारा साधु