किमयागार - 11

  • 2k
  • 1.1k

मुलाला मनातुन असेच वाटत होते की गर्दीमुळे तो तरुण हरवला असे वाटत असेल. थोडा वेळ याच विचारात गेला, आणि जवळच्या टॉवरवर एक धर्मगुरू आले तेंव्हा सर्व जण कपाळ जमीनीवर टेकवून बसले आणि अचानक सर्वजण स्टॉल बंद करून निघून गेले. संध्याकाळ झाली. तो एका नवीन देशात होता , तेथील भाषा पण त्याला येत नव्हती. तो मेंढपाळ पण राहिला नव्हता. आणि त्याच्या खिशात परत जाण्यासाठी पैसे पण नव्हते. सूर्योदय व सूर्यास्त यामध्ये बरचं काही घडून गेले होते. अचानक सर्व आयुष्य बदलले होते. त्याला रडू येऊ लागले होते. मार्केट रिकामे होते, तो घरापासून दूर होता, त्याच्या अश्रुंचा बांध फुटला. त्याला वाटू लागले की