नागपूरचे ते पवित्र आत्म्ये - भाग 2

  • 867
  • 318

ते पवित्र आत्म्ये भाग दोन गणेश विचारत होता त्यांना नागपूरच्या कहाण्या. त्यातच विचारत होता त्या राजांचे शौर्य. त्यात त्या सर्व पवित्र आत्म्यांनी सांगीतलं होतं की मानवासारखं ते जात वा धर्म पाळत नाहीत. मालमत्तेवरुन भांडणं करीत नाहीत. तसेच कोणत्याच स्वरुपाचा भेदभाव करीत नाहीत. तरीही काही प्रश्न अजुनही होतेच गणेशजवळ. त्या प्रश्नांची उत्तरं अजुनही सापडली नव्हती त्याला. तो प्रश्न विचारताच होता. तसा त्यानं तद्नंतर प्रश्न विचारलेही. परंतु ते प्रश्न इतरांना विचारले होते. बख्त बुलंद शहाला विचारले नव्हते. तोच बख्त बुलंदशहा त्याच्या पुढ्यात आला. म्हणाला, "अरे, आम्हालाही विचार आमचा इतिहास. आम्हीही नागपूरच्याच इतिहासातील माणसं. नागपूर वसविण्यात आमचाही मोलाचा वाटा आहे." गणेशला बख्त बुलंद