गुन्ह्यांना ब्रेक लावा

  • 1.4k
  • 1
  • 561

गुन्ह्यांना ब्रेक लावा षडरिपूच आवाक्यात ठेवा माणसाचे सहा शत्रू आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. या सहा शत्रूंनी गुन्हे घडत असतात. यात कोणताही व्यक्ती कितीही स्वतःला कन्ट्रोल करीत असला तरी गुन्हा घडतोच. अशावेळेस गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला वेळीच समुपदेशनाची गरज असते. ज्याप्रमाणे एखाद्या आजारादरम्यान वेळीच डॉक्टर उपलब्ध झाला, तर तो आजार बळावत नाही. तशीच परिस्थिती गुन्ह्यातही असते. गुन्हेगारी..... गुन्हेगारीचा दररोजचा आकडा पाहता तो वाढतच चालला असल्याचे व फुगीर होत असल्याचे निदर्शनास येते. तसं पाहिल्यास पोलीस प्रशासन सक्रिय असलं तरी गुन्हेगारी घडतेच. त्याचं कारण म्हणजे गुन्ह्याबाबतची असलेली अनुकूल परिस्थिती. साधारणतः गुन्हे हे राग, ज्याला आपण क्रोध म्हणतो. द्वेष, ज्याला आपण