निदान आपल्या मुलांसाठी

  • 1.4k
  • 546

निदान आपल्या मुलांसाठी तरी...... *आजच्या काळात पती पत्नीतील भांडणं वाढतच चाललेली दिसून येतात. त्याचं कारण म्हणजे कायद्यानं पत्नी वर्गांना दिलेली सुट. कलम ४९८ व कलम २५ अ ह्या पत्नी वर्गासाठी हक्काच्या कलमा. त्यातच आता नवीनच कायदा असा आलाय की कुटूंबात जर अत्याचार होत असेल, तर कायद्यानुसार महिलांना अधिकार प्राप्त आहेत. शिवाय महिलांच्या सक्षमीकरणासाठी तिला तेहतीस प्रतिशत जे आरक्षण होतं. त्यातही वाढ झालेली आहे. त्यातच आजच्या काळात महिलांच्या सक्षमीकरणासाठी योग्य पाऊल उचलत सरकारनं मालमत्ता, बँकेचं खातं, राशनकार्ड ह्या सर्व गोष्टीवर महिलांना प्रमुख बनवून टाकलं आहे. शाळेतही महिला असलेल्या आईचं नाव मुलांच्या नावासोबत आहे. आता कुटूंबातील नवीन बँक खातं हे महिलांच्या नावावर,