नियती - भाग 8

भाग -8आणि आता दुसरी चिंता होती की दिवसेंदिवस आता मोहितला समजत जाणार होते ,अक्कल येणार होती,तर लोकांकडून खरे समजण्याची भीती होती दोघांना.एक दिवस कवडू असाच बसलेला होता. त्याच्या मनात तीच तगमग सारखी होती आणि दिवस जात होते तशी तशी नवीन चिंता  ग्रासंत होत्या..आपल्या मनात असलेली चिंता ती...कवडू पार्वतीला बोलू लागला...की....."पार्वती ...आता मोहितला आपल्याला शाळेत घालावे लागेल.""हो.". कवडू बोलायला मोहितला शाळेत घालावे लागेल पण त्यालाही माहीत होते की त्याच्याने हे होणार नाही शाळेत मोहितला प्रवेश घेऊन देणे.कारण गावामध्ये  त्या लोकांना शाळेमध्ये प्रवेश नव्हता. आणि त्याची परिस्थिती मोहितला बाहेर पाठवण्याची नव्हती.इकडे पार्वती म्हणाली...."केव्हा घालणार..??""तेच विचार करताय मी. त्याला इथे तर आपण घालू