इच्छा

(13)
  • 5k
  • 6
  • 1.4k

आयुष्याच्या उत्तरार्धात आल्यावर मनुष्याचा बहुतांश इच्छांची पुर्ती झालेली असते. वयाची सत्तरी ओलांडलेले सदाशिवराव सुद्धा आपलं एकाकी आयुष्य समाधानाने जगत होते. त्यांच्या दोन्ही मुलांनी नोकरी धंद्यासाठी शहरांमध्ये आपापले संसार थाटले होते. सदशिवरावांना मात्र आपलं गाव सोडवत नव्हत. लहानपणापासून रामायण, महाभारातामाधल्या गोष्टी ऐकत, वाचत आलेल्या सदाशिवरावांच्या अजूनही काही इच्छा अपूर्ण राहिल्या होत्या. अश्वथाम्याला पहायची त्यांची इच्छा होती.