स्वराज्यसूर्य शिवराय - 12

(15)
  • 4.7k
  • 1.8k

स्वराज्यावर आलेली संकटाची मालिका खंडित होण्याची शक्यता दिसत नव्हती. स्वतः शिवराय सिद्दी जौहरच्या वेढ्यात पन्हाळगडावर अडकले होते. जौहर भर पावसाळ्यातही वेढा शिथिल होऊ देत नव्हता. दुसरीकडे शाईस्तेखान लालमहालात बसून स्वराज्याची हानी करत होता. तातडीने काहीतरी निर्णय घेणे आवश्यक होते. युक्ती, शक्ती, गनिमीकावा वापरून गनिमांना हैराण केलेच पाहिजे या विचाराने शिवरायांनी एक धाडसी निर्णय घेतला. एक जोखीम पत्करण्याचे ठरवले. विश्वासू सहकाऱ्यांनाही शिवरायांचे म्हणणे पटले. त्यांनीही होकार दिला. लगेचच सर्वांनी मिळून त्या योजनेला मूर्त स्वरूप देण्याची योजना आखण्याची तयारी सुरू केली. हे सारे करत असताना कमालीची खबरदारी घेतली जात होती. 'भिंतीला असणाऱ्या कानांनाही' आणि सिद्दीच्या खबऱ्यांनाही काहीही कळू नये याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिले जात होते..