अनामिक भिती

  • 3.2k
  • 1.3k

अनामिक भिती कॉलेजला सुट्टया लागल्यामुळे साहेबराव आज लयचं आनंदात होता. केव्हा एकदा घरी जाऊन आपल्या बालमिञांना भेटतो असे त्याला झाले होते. तो काळ १९८० चा होता. शिक्षणाचे प्रमाण अगदी तुरळकच. गावात जेवढी शाळा तेवढंच मुलानं शिकावं हा पायंडाचं पडलेला. त्यावेळी आजूबाजूला जळपासच्या मोठ्या शहरातही महाविद्यालये नव्हते. साहेबरावच्या मनात शिकण्याचीे ऊर्मी होती. घरची परिस्थिती जरा बरी असल्यामुळे त्याने थेट औरंगाबाद गाठले. तेथिल मिलिंद महाविद्यालयात बी.ए.ला प्रवेश घेतला . दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर सहा महिन्यापासून तो औरंगाबादला आला होता त्यामुळे भूमराळा या जन्मगावी जायची ओढ त्याच्या मनात निर्माण झाली होती.