काळ आला होता पण वेळ नाही आली होती - 2

  • 5.9k
  • 2.2k

त्या क्रूर आणि भयंकर हास्याने कार्तिक आणि पंकज ने एकमेकांकडे पाहिले दोघांच्या पण नजरा बोलल्या मग हळूहळू दोघेही जवळ येऊन बोललेपंकज = "काही ऐकलं का कार्तिक भाऊ?"कार्तिक ने मान हलवत हो म्हटलं ."आता इथे जास्त वेळ थांबन बरोबर नाही आपल्याला लवकरात लवकर गाव गाठावे लागते." समोर हातात कुर्‍हाड घेऊन विशाल ,मागे मुकेश हातात सत्तुर घेऊन, त्यामागे नितेश दोन्ही हात खिशात टाकून ,राहुल ,कार्तिक आणि पंकज हातात काड्या धरून आजूबाजूचा कानोसा घेत सामोर वाढत होते. सायंकाळची वेळ झाली होती .सर्व एकापाठोपाठ चालत होते .मध्येच एखादे हरिण किंवा ससा रानात पळत सुटत होते .सर्वत्र आज शांतता होती .आज निसर्गाने