सांन्य... भाग ४

  • 14.3k
  • 7.1k

"एकाच वेळी २२ मुलांचं अपहरण, एका दिवसात त्याने सगळ्यांच्या घरी पत्र पाठवलं ते पण एकाच वेळी कसं शक्य आहे हे"???....शुभम "सर हा एकटा नाहीये, ह्याच्या सोबत अजून लोक असतील जे मिळून हे सगळं करतायत"..... अजिंक्य तेव्हाच पोलीस स्टेशन मध्ये एक माणूस आला, हवालदार त्याला आत येऊ देत नव्हते, पण तो ऐकत नव्हता..... शुभम ने केबिनच्या आतून त्या माणसाचा आवाज ऐकला आणि बाहेर आला.... "बोला काय झालं" ??..... शुभम "सर खूप महत्त्वाचे बोलायचं होतं"...... तो माणूस "हो बोला काय झालं".....?? शुभम त्या माणसाने खिशातून पत्र काढल आणि ते शुभम ला दिल, शुभम पत्र बघताच शॉक झाला.... "सर अजून एक पत्र"......?? अजिंक्य