जग गोल आहे

  • 5.4k
  • 1.5k

एक छोटे गाव असते, त्या गावात राजू नावाचा गरीब मुलगा राहत असतो. राजूच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असते. राजू शाळा सुटल्या नंंतर घरोघरी जाऊन मातीच्या वस्तू विकत असे, आणि येणाऱ्या पैशातून राजू शाळेचा खर्च भागवत असे. एक दिवस दुपारची वेळ होती, राजू घरोघरी जाऊन दार वाजवून मातीच्या वस्तू विकत होता, दुपारची वेळ असल्याने राजूला खूप भूूूक लागली होती, म्हणून राजूने ठरविले की,पुढील दार वाजवल्या नंतर वस्तू बद्दल पैशांंऐवजी जेवणाची मागणी करायची. राजूने ठरविल्याप्रमाणे पुढील दार वाजविले, दार उघडले तर समोर एक सुंदर मुलगी उभी असते, तीचे नाव गीता होते, राजूने घाबरतच पिण्यासाठी पाणी मागितले. गीता किचन मध्ये पाणी आणण्यासाठी गेल्यावर तीने विचार केला की,