पुनर्भेट भाग ६

  • 9.1k
  • 4.7k

पुनर्भेट भाग ६ तिने सतीशच्या ऑफिसला चौकशी केली तर तो रजेवर होता आहे समजले . जवळ जवळ तीन चार आठवडे तो परतलाच नाही रमाची अतिशय वाईट अवस्था झाली तेव्हा . काका काकुंना पण काही सांगायची सोय नव्हती . नंतर एके दिवशी सतीश परतला.. जणु काय काहीच घडले नाही असे वागू लागला . इतके सगळे झाल्यावर रमाला आता आपले आणि मेघनाचे भविष्य अंधारात दिसायला लागले . सतीश मात्र मजेत होता , कधीकधी त्याचे पिणे वगैरे कसे काय पण बंद असायचे . त्यावेळी रमाला तो म्हणत असे ,”तु काळजी नको करू तुला पाहिजे ते दागिने ,घर सगळे सगळे मी तुला घेऊन देईन