जानू - 9

  • 8.9k
  • 3.5k

अभय जानू पासून लांब राहायचं ठरवतो..आणि जानू ही आता परत त्याच्या वर रागवायच नाही असं ठरवते. अभय जरी आता जानू समोर येत नसला तरी त्याचं सर्व लक्ष जानू वर असत .तो तिला दुरून पाहूनच खुश होत असतो .जानू ला ही आपण उगाच इतका राग केला अभय चा याच वाईट वाटत पणं ती त्याला काहीच बोलत नाही. अभय च्या आते भाऊ च लग्न असत ..त्यासाठी अभय ८ दिवसा साठी गावी जाणार असतो पणं त्याला जाण्याची अजिबात इच्छा नसते ..८ दिवस जास्तच होतात ..इथ एक दिवस जानू नाही दिसली तर आपण बेचैन होतो ..आणि आता ८ दिवस तिला न पाहता कसं राहायचं