जानू - 44

  • 6.7k
  • 1
  • 2.9k

जानू न बोलताच निघून गेली.. पहिले दोन दिवस तर आपण अभय सोबत जे वागलो ते चुकीचं आहे अस तिला वाटलच नाही..पणं नंतर मात्र ना राहून अभय ची सारखी आठवण येऊ लागली.. अभय कडून मात्र एक ही मॅसेज अथवा फोन तिला आला नव्हता..त्याचे स्टेटस ही दिसत नव्हते आता..आपण अभय ला काय काय बोललो त्या दिवशी असा विचार करत बसली असताना तिला पुन्हा सर्व आठवल....आणि जस आठवल त स..तिला घाम फुटू लागला .. अंग कापू लागलं...आयुष्याचा समीर होवू नये म्हणून आपण स्वतः ला जपत राहिलो पणं आपण स्वतः समीर होऊन बसलो ..हे कसं कळलं नाही आपल्याला याचं विचारांनी तिचं डोकं सुन्न होवू