प्रेमगंध... (भाग - २५)

  • 6.7k
  • 1
  • 3.6k

आपण मागच्या भागात पाहीलं की, राधिकाचे बाबा खूप संतापलेले असतात... तो गुंड धमकीच्या स्वरुपात त्यांच्याशी बोलत असतो म्हणून राधिकाचे बाबा त्याला रागातच कानाखाली मारतात आणि त्याला निघून जायला सांगतात... घरातले सगळे खूप घाबरलेले असतात, पण राधिका आणि बाबा सगळ्यांना धीर देतात... इथे अजयची आई पण अजयवर रागावलेली असते. पण अजयचे बाबा आणि अजय तिला समजावतात... आता बघूया पुढील भागात काय होते ते.... --श्रीरामपूर-- भालेकर वाडा--- गोविंद बाहेरून आल्यापासूनच घरात सगळ्या वस्तूंची आदळआपट करत फिरत होता... आणि जोरजोरात ओरडत होता... त्याचे काही साथीदार त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. पण तो कोणाचंच ऐकत नव्हता. घरातले सर्व नोकरचाकर खूप घाबरले होते... ते