प्रेमगंध... (भाग - २६)

  • 6.3k
  • 3.3k

(आपण मागच्या भागात पाहिलं की गोविंद कुसुमला रागारागात बोलत असतो. मला काहीही करावं लागलं तरी चालेल पण मी राधिकासोबतच लग्न करणार असं तो तिला सांगत असतो. कुसुम त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असते. पण तो काही तिचं ऐकत नाही. कुसुमला त्याच्या बोलण्याचं खूप वाईट वाटते आणि ती पश्चात्तापाने रडू लागते. सावित्रीमाय तीला समजावते आणि तीला स्वतःच्या चुकीची जाणीव होते. ती सावित्रीमायला घेऊन राधिकाच्या घरी जाते आणि तीच्या आईबाबांची माफी मागते...) कुसुम राधिकाच्या बाबांसमोर जाऊन उभी राहिली. आणि तीने खाली वाकून राधिकाच्या बाबांचे पायच पकडले आणि माफी मागू लागली. राधिकाच्या बाबांनी आपले पाय एकदमच मागे घेतले. राधिकाचे बाबा - "ताई, लहान