प्रेमगंध... (भाग - २७)

  • 6.4k
  • 1
  • 3.4k

(आपण मागच्या भागात पाहिलं की, कुसुम आणि सावित्रीमाय राधिकाच्या बाबांना परत आपल्या गावी येऊन राहायला सांगतात. नेहमीप्रमाणेच अजय आणि अर्चनाची मजाकमस्ती चालू असते. शाळेची सहल श्रीरामपूरमध्ये जाणार असल्यामुळे राधिकाची जायची अजिबात इच्छा नसते, म्हणून अजय रागवून निघून जातो. पण अर्चनाच्या बोलण्यावर ती सहलीला जायला तयार होते. आता बघूया पुढे काय होते ते....) अजयची आई - "अजय, तूला आईची काही काळजी आहे की नाही रे...." किचनमध्ये जेवण करता करताच आई बोलत होती. अजय पटकन आईजवळ गेला. अजय - "अगं आई, काय झालं? तुझी तब्येत बरी नाही का? ये तू इथे येऊन बस. आराम कर मी करतो सर्व. बस तू इथे..."