श्री संत ज्ञानेश्वर - ४

  • 4.5k
  • 2.3k

संत ज्ञानेश्वर—४ आई वडिलांनी प्रयश्चित्त म्हणून देहत्याग केला.परंतु एवढ्याने मुलांच्या जीवनातील समस्या सुटलेली नव्हती.उपनयनाची चिंता ज्ञानादेवाला लागून राहिली होती.परंतु निवृत्तीनाथांची भूमिका वेगळी होती. निवृत्तीनाथ म्हणाले अरे ज्ञानदेवा आपल्या सारख्या जन्मजात जीवन मुक्तांना ह्या सोळा संस्काराची अवश्यकताच कांस्य?शाश्रोक्त संस्कार कशासाठी?जीवनाच्या.जीवनाच्या कर्म राहाटीतून मुक्त होण्यासाठीच ना?तर मग आपण जे जीवन जगतो,ते मुक्ताचेच नाही तर कुणाचे?तू वर्णाश्रम,धर्माप्रमाणे,कुळाचार धर्माप्रमाणे करावयाचा आग्रह सोडून दे.आपण वर्णाश्रम धर्माच्या,कुळधर्माच्या पलिकडे गेलो आहोत.सोपान देवाची भूमिका वेगळी नव्हती.ज्ञान देवांना या दोघांची भूमिका मान्य होती.परंतु त्यांच्यातल्या विचारवंत सदैव जागृत असे.,धर्माच्या खोट्या आणि विपरीत आचारणामुळे सामाजिक आणि वैयक्तिक जीवनात एवढे अनर्थ माजले आहेत त्या धर्माचे खरे स्वरूप कोणीतरी समाजाला सांगितलेच पाहिजे.म्हणून आळंदी