शाळेची वेळ बदलवायचीय काय?

  • 3k
  • 687

शाळेची वेळ बदलवावी काय? शाळा नऊ नंतर भरवायची का? हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आता प्रत्येक जनमाणसात निर्माण झाला आहे. तसं पाहता त्यावर मा. शिक्षण मंत्र्यानंही आपलं मत मांडलं आहे. त्यावर प्रत्येकजण आपापलं मत मांडत आहेत. कोणी कोणी काहीही उलटंसुलटं बरळत आहेत. आज वेळ बदलवायलाच हवी असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. तसं आवाहन मा. शिक्षकमंत्री दिपक केसरकर यांनी केले आहे. त्यातच त्यांनी म्हटलं आहे की असं केल्यानं त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होवू शकतो. तसं पाहिल्यास तसं त्यांचं म्हणणं बरोबर असून तो त्यांचा निर्णय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने रास्त आहे. वरील दृष्टिकोनातून विचार केल्यास झोप.......माणसाची झोप ही अतिशय महत्वपुर्ण गोष्ट आहे.