तोतया वारसदार पात्र रचना व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. रोहन - सौमित्रचा मुलगा लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – सहावी पिढी. गोकर्ण ला स्थायिक. वसुधा - लक्ष्मण आणि वर्षाची आई. बबन - सारंग वकिलांचा चपराशी सुभाष गोखले - बबनचा बार मधला मित्र. भाग २२ भाग २१ वरून पुढे वाचा.... संध्याकाळी, सारंग गेल्यावर बबननी त्यांच्या नोटिंगची फाइल काढली. त्यात सारंगने लिहिल होतं की व्यंकटेश आणि सौमित्र दोघांनाही संपत्तीत स्वारस्य नाहीये, जय आज रात्रीच लंडनला वापस जाणार आहे आणि निशांत बरोबर रोहन सुद्धा गोकर्णाला पडताळणी करायला गेला आहे. अविनाश बद्दल