तोतया वारसदार पात्र रचना व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. रोहन - सौमित्रचा मुलगा लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी. गोकर्णला स्थायिक. विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. भाग २४ भाग २३ वरून पुढे वाचा.... रात्री जेवण झाल्यावर बराच वेळ गप्पा चालू होत्या. निशांतने आतापर्यन्त काय काय घडामोडी झाल्या त्याचं वर्णन केलं. अविनाशची कहाणी सांगतांना तो खूपच भावुक झाला होता. इतरांना पण त्या गोष्टीने भरून आलं होतं. निशांतने हे पण सांगीतलं की गोष्ट बाहेर कुठेही बोलायची नाहीये, कारण अविनाशच्या जीवाला