तोतया वारसदार पात्र रचना निशांत - शोधकर्ता व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. रोहन - सौमित्रचा मुलगा लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी. गोकर्णला स्थायिक. भाग २५ भाग २४ वरून पुढे वाचा.... “अरे नाही, त्यांना सांग आम्ही सर्व साताऱ्याला काही कामानिमित्त येतो आहोत, तुम्हाला भेटायची आमची इच्छा आहे. त्यांना केंव्हा वेळ आहे, आणि त्यांच्या घराचा पत्ता विचारून घे.” काकू म्हणाल्या. “ठीक आहे, असंच करतो.” – लक्ष्मण म्हणाला आणि त्यांनी फोन लावला. थोडा वेळ बोलणं झाल्यावर त्यांनी फोन ठेवला तेंव्हा खुश दिसत होता. “त्यांनी सांगितलं की आमचं दुकान ८