लाल महाल आणि शाहिस्तेखान - भाग १

  • 12.4k
  • 1
  • 3.4k

स्वराज्यावर राहू केतू चालून आले होते ...त्यातला सिद्दी जौहरला राजांनी पन्हाळा गडाखाली ४ महिने झुलत ठेवले होते आणि संधी मिळताच...त्याच्या पोलादी वेढयातून राजे सुखरूप निसटले होते..पण शिवा काशीद, बाजीप्रभू आणि फुलाजी देशपांडे अशी नररत्ने कामी आली होती.. पुन्हा ताज्या दमाच्या विशाळगडाला चार पाच महिने वेढा घालण्याची ताकत आता सिद्दी जौहर मध्ये नव्हती आणि वेढा घातलाच तरी..राजे पुन्हा पळून गेले असते तर काय.. सिद्दी जौहरचा आत पुरता बिमोड झाला होता.. पण राहू गेला तरी अजून केतू आपला विषारी वेढा घालून लाल महालात गेली तीन वर्षे बसला होता..आणि त्याच्या बरोबर होते जवळ जवळ एक लाख