कर्म - गीतारहस्य - 2

"कर्म- गीतारहस्य"गीतारहस्य हा ग्रंथ गीतेतील कर्मयोगाचे महत्व स्पष्ट करतो.कर्मयोगाच्या साधनेसाठी आवश्यक असलेल्या निःसंग व ब्रह्मनिष्ठ स्थितीची प्राप्ती कोणत्या साधनांद्वारे होते, ते आता सांगितले आहे. मनात फलाशा न ठेवता जो आपली नेमून दिलेली कर्मे करतो, तोच खरा संन्यासी आणि कर्मयोगी समजावा. ज्याला संन्यास म्हणतात तोच कर्म योग समजावा कारण काम्यबुद्धीरुप फलाशेचा त्याग (संन्यास) केल्याशिवाय कोणीही कर्मयोगी होत नाही.साधनेच्या पहिल्या अवस्थेत कर्म हेच योगसिद्धीचे कारण बनते.कर्मयोगी आपली सर्व कर्मे शांतचित्ताने, कर्तव्य म्हणून, फळाशा न ठेवता करतो.अशा प्रकारे फळाशेचा त्याग करणारा मनुष्यच खरा संन्यासी आणि योगारूढ मानला जातो. प्रयत्नशील मनुष्यांसाठी फळाशेचा त्याग करून कर्मयोगाची साधना शक्य होते.मनुष्याने स्वतःच आपला उद्धार करावा, कारण आपणच आपले