पात्रांचा परिचय:- विरकर कुटुंब- प्रताप विरकर (वडील) - भाग्यश्री विरकर (आई) साईश (मोठा भाऊ) गौरी (कथेची नायिका) देसाई कुटुंब- सुलभा देसाई (आजी) अनंत देसाई (वडील) - स्वाती देसाई (आई) कैवल्य (मोठा भाऊ) - मयुरी (वहिनी) वरद (कथेचा नायक) अनुष्का (लहान बहीण) _____________________________________ "अहो ऐकताय का?"- प्रताप राव हॉल मधून आवाज देत बोलले. "हो आलेच. काय झालं?"- भाग्यश्री ताई किचन मधून हात पुसत बाहेर आल्या. "गौरी कधी येणारे?"- प्रतापराव "येईल थोड्या वेळात. इंटरव्ह्यू द्यायला गेलीये"- भाग्यश्री ताई "हम्म. आल्यावर बोलूया"- प्रतापराव संध्याकाळी गौरी घरी येते. आल्या आल्या रूम मध्ये जाऊन फ्रेश होते. आणि किचन मध्ये आईला स्वयंपाक करण्यात मदत करते. साईश आणि प्रतापराव टीव्ही बघत असतात. प्रतापराव गौरी आणि भाग्यश्री ताईंना हॉल मध्ये बोलवतात. सगळे हॉल मध्ये बसून प्रतापराव आता काय बोलणार ह्या कडे कान लावून बसतात.

नवीन एपिसोड्स : : Every Monday, Wednesday & Friday

1

वेड लावी जीवा - भाग १ - पहिली भेट??

ही कथा आहे त्या दोघांची... दूर गेलेल्या त्या दोघांना नियतीने पुन्हा एकत्र आणलंय... काय असेल नियतीच्या मनात... काय घडेल दोघांच्या आयुष्यात... एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या त्या दोघांच्या मनात प्रेमाचे अंकुर फुटेल का?... जाणून घेण्या साठी नक्की वाचा वेड लावी जीवा... ही कथा आणि त्यातील पात्र पूर्णतः काल्पनिक असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळला तर तो निव्वळ योगायोग समजावा.️ ...अजून वाचा

2

वेड लावी जीवा - भाग २ - लग्नाला होकार??

दोघेही गप्प असतात पण दोघांच्या मनात खूप काही विचार चालू असतात. आणि डोळ्यात दिसत असतो प्रचंड राग... "तू इथे आला आहेस? नालायक"- गौरी "तोंड सांभाळून बोल जरा आणि माहित नाही का तुला इथे मी मुलगी बघायला आलोय ते?"- वरद "निघायचं हा आत्ताच्या आत्ता इथून निघायचं" गौरी चिडून बोलत होती. "मला काही हौस नाही तुझ्या दारात पाय ठेवायची. तुला बघायला येतोय हे माहीत असतं तर आलोच नसतो मी इथे परस्पर नकार कळवला असता"- वरद "हो मी जशी काय तुझ्याशी लग्न करायला होकारच देणारे."- गौरी "देऊ पण नकोस. उगाच आलो इथे तुझं तोंड बघावं लागलं मला"- वरद "मग कशाला थांबलाय निघ ...अजून वाचा

3

वेड लावी जीवा - भाग ३ - महत्त्वाचं बोलायचंय...

'ही हे सगळं मुद्दाम मला त्रास द्यायला करतेय. गौरी विरकर तुझा हा निर्णय खूप महागात पडणारे तुला'- वरद स्वतःशीच आणि त्याने रागाने आपली मूठ आवळली.फोनवर बोलून झाल्यावर प्रतापराव खूपच खुश दिसत होते. भाग्यश्री ताईंना सुद्धा आनंद झाला होता. फक्त गौरीचा चेहरा उदास झाला होता. "काय मग बेटा आता तर होकार आला आहे तिथून. आता तर लग्न करायला तयार आहेस ना? नाही म्हणजे तस वचन दिलं आहेस तू मला!"- प्रतापगौरीच्या चेहऱ्यावर कसलेच हवं भाव दिसत नाही. ती काहीच बोलत नाही फक्त शांत उभी राहते. प्रतापराव आत त्यांच्या खोलीत निघून जातात."बाळा तुला आनंद नाही का झाला?"- भाग्यश्री"इथे माझ्या आयुष्याची वाट लावली ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय