रानभूल भाग १( काही दिवसांपूर्वी गोवा फोंडा येथील पाच मुले दोडामार्ग विर्डी येथल्या घनदाट जंगलात वाट चुकली होती.रात्री त्यांची सुटका पोलीसांनी केली होती.या घटनेवर आधारित ही गूढ रम्य थरारक दिर्घ कथा आहे.यातील नावे खरी नसून घटना कल्पनेने उभ्या केल्या आहेत. चुकून साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) " रोशन,बघ ना घरी फोन लागतो का?"मनस्वी रडवेल्या आवाजात म्हणाली." मघा पासून पन्नास वेळा प्रयत्न केला...रेंज नाही. पण या गडबडीत चार्जिंग दहा टक्क्यांवर आलंय." रोशन उदासवाणा होत म्हणाला." घरी गोंधळ उडाला असेल. फोन करत असतील."मनस्वीच्या डोळ्यात खरेखुरे अश्रू उभे ठाकले. आकाश हळूहळू गहिरे होत चालले होते.अंधार वेगाने आपले साम्राज्य पसरवत होता. घरट्यांकडे परतलेल्या पक्ष्यांचे सुस्तावलेले श्वास वाऱ्यात मिसळून दूरवर जात होते.नदीचं पाणी आता काळसर होत चाललं होत. रातकिड्यांचा कर्कश आवाज परीसरात घमू लागला होता." कोणाकतरी फोन लागता काय बघ."मनवेल नासीरला म्हणाला." ना रे,माझ्या मोबाईलान ओन्ली तीन पर्सेंट बॅटरी आसली." नासिर निराश होत म्हणाला." उदय, सव्वासात झाले. आता दिसायचं पण बंद झालं.तू बघ जरा प्रयत्न करून.
रानभूल - भाग 1-2
रानभूल भाग १( काही दिवसांपूर्वी गोवा फोंडा येथील पाच मुले दोडामार्ग विर्डी येथल्या घनदाट जंगलात वाट चुकली होती.रात्री त्यांची पोलीसांनी केली होती.या घटनेवर आधारित ही गूढ रम्य थरारक दिर्घ कथा आहे.यातील नावे खरी नसून घटना कल्पनेने उभ्या केल्या आहेत. चुकून साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) " रोशन,बघ ना घरी फोन लागतो का?"मनस्वी रडवेल्या आवाजात म्हणाली." मघा पासून पन्नास वेळा प्रयत्न केला...रेंज नाही. पण या गडबडीत चार्जिंग दहा टक्क्यांवर आलंय." रोशन उदासवाणा होत म्हणाला." घरी गोंधळ उडाला असेल. फोन करत असतील."मनस्वीच्या डोळ्यात खरेखुरे अश्रू उभे ठाकले. आकाश हळूहळू गहिरे होत चालले होते.अंधार वेगाने आपले साम्राज्य पसरवत होता. घरट्यांकडे परतलेल्या पक्ष्यांचे ...अजून वाचा
रानभूल - भाग 3-4
रानभूलभाग ३ पाचही जण झपाझप पावलं उचलू लागले. वेळ खूप झालाय याच भान त्यांना आलं होतं. त्यांनी पुन्हा काठ्या मार्गावर चालताना पाय घसरणीची शक्यता होती.सगळी जपून पावले उचलत होती.तेवड्यात वरच्या बाजूला सरसराट ऐकू आली.चार ते पाच प्राणी झुडपांतून धावत येत असावेत." हा कसला आवाज?" मनवेलने विचारले." बहुतेक डुक्कर असावेत. आपण त्यांच्या वाटेत आडवे आलो तर आपली खैर नाही." रोशनने सर्वांना सावध केले ." त्यांचे सुळे भयानक असतात. भले भले प्राणी त्यांनाघाबरतात." नासीर म्हणाला." सारखो भिययता." मनस्वी म्हणाली." जिथे आहात तिथे शांत उभे रहा." उदय म्हणाला.तेवढ्यात त्यांच्या डोक्यावरुन मघाचचा कोतवाल पक्षी कर्कश आवाजात ओरडत गेला.काही क्षण सगळे जीव मुठीत धरून ...अजून वाचा
रानभूल - भाग 5
रानभूल ५ रानकुत्र्यांचा एक कळप रात्रीच्या शिकारीसाठी बाहेर पडला होता.अत्याधिक क्रूर असलेला हा रानटी पशू!एकदा शिकार टप्प्यात आल्यावर त्यांचे तोडल्या शिवाय सोडत नाही.अमानुष पध्दतीने ते शिकार करतात.वाघ सुध्दा ह्या कुत्र्यांच्या कळपां पासून दूर राहणे पसंत करतात. ह्या कुत्र्यांच्या प्रमुखाला मानवी रक्ताचा वास आला.त्याने इतरांना सूचित केले.नेमक्या दिशेचा अंदाज घेत त्याने कळपाला पळण्याचा हुकूम दिला.बघता बघता ते सुसाट धावू लागले खडपांवरून...झुडपांतून.धडाधडउड्या मारत भुकेलेले पशू धावत होते.मानवी मांस खायला मिळणार या कल्पनेनेउत्तेजीत होत ते पळत होते. त्यांच्या तोंडातून लाळ गळत होती.विचित्र आवाज करत ते एकमेकांशी संपर्क करत होते. यांची गंध ओळखण्याची व त्याचा माग काढण्याची क्षमता अफाट असते.बघता बघता ते सगळे ...अजून वाचा