आयुष्याचं सारं

(33)
  • 52k
  • 21
  • 27.6k

कृपया ध्यान दिजीए ,मुंबई जाने वाली गाड़ी दो घंटे देरी से चल रही हैं .....प्लॅटफॉर्मवर मी पाय ठेवताच अनाउसमेंट ध्वनी माझ्या कानावर आदळत  होता . केवढ्या  घाईत निघाली मी घरून . झालं आता दोन तास जप करत बसा इथे !ह्या मुंबई लोकल ट्रेनचा हाच तगादा असतो . लोकल कधी  वेळेत आली तर सूर्याने दिशा बदलवल्याचे डोहाळे लागतात . खाली बर्थचा मी शोध घेत निघाली  . पण कुठेच खाली बर्थ नजरेस पडत नव्हता . मी समोर चालू लागली शेवटी एक खाली बर्थ दृष्टीसपडला तिथे जाऊन बसली .      नजरेसमोरून धाडधाड करत जाणाऱ्या गाड्या ह्यात माझी गाडी कधी येणार आणि इंटरव्ह्यू कसा जाणार  ह्याच विचारात

Full Novel

1

आयुष्याचं सारं (अगतिका) भाग - 1

कृपया ध्यान दिजीए ,मुंबई जाने वाली गाड़ी दो घंटे देरी से चल रही हैं .....प्लॅटफॉर्मवर मी पाय ठेवताच अनाउसमेंट माझ्या कानावर आदळत होता . केवढ्या घाईत निघाली मी घरून . झालं आता दोन तास जप करत बसा इथे !ह्या मुंबई लोकल ट्रेनचा हाच तगादा असतो .लोकल कधी वेळेत आली तर सूर्याने दिशा बदलवल्याचे डोहाळे लागतात .खाली बर्थचा मी शोध घेत निघाली . पण कुठेच खाली बर्थ नजरेस पडत नव्हता . मी समोर चालू लागली शेवटी एक खाली बर्थ दृष्टीसपडला तिथे जाऊन बसली . नजरेसमोरून धाडधाड करत जाणाऱ्या गाड्या ह्यात माझी गाडी कधी येणार आणि इंटरव्ह्यू कसा जाणार ह्याच विचारात ...अजून वाचा

2

आयुष्याचं सारं (भाग -2)

घे उतुंग भरारी तिचा नाच बघण्यासाठी पाऊले रोज त्या नृत्यमंडळाकडे वाड्याच्या दिशेनेपडायची .... होऊन जाऊदे एकदा ... अशी घोळक्यातून तीन चार झण मारायची ... परत परत नाचण्यासाठी केलेली आजर्व नाही पण लालसी विनंतीच ती ...तिच्यासाठी पोटाची खळगी भरण्याची हुरूप ठरली ... आता नाचणं त्या कित्येकीसाठीनुसता छंद राहिला नाही ... त्यांच्या अश्या जगण्याचा फरक पडतो का कुणाला ?? ....त्यांचे पितळी हस्यही काय कामाचे ?? अनेक अनुत्तरित प्रश्न .... पण , जेव्हा हे प्रश्नत्या नाचरणींना पडतात तेव्हा ....मूळ कथा :- कोमल प्रकाश मानकर पात्रे :- निलिमा , मंजिरी , धोंडो , गण्या , यामिनी , दिपमाला , शिखा .कृपया ...अजून वाचा

3

आयुष्याचं सारं (भाग-3)

दोन तीन वर्षाआधीची गोष्ट आहे . मी आणि माझी मैत्रीणराशी आम्ही वर्धेला कॉलेज करत असताना . दुपारी तीनची ट्रेन म्हणून कॉलेज मध्ये टिफिन न खाता स्टेशनवर येऊन खायचो . त्या दिवशीही आम्ही स्टेशनवर येऊन टिफिन खायला बसलो . तेवढ्यात आम्ही जेवण करत असताना एक म्हातारे आजोबा आमच्या जवळ आले आणि आम्हाला म्हणाले ," बेटा , मला खूप भूक लागली काही खायला देता का ? " आम्ही दोघींनी आमच्या डब्यातून एक एक पोळी आणि भाजी काढून त्यांना दिली . आजोबाने ते जेवण आपल्या थैलीत भरलं आणि तिथून निघून गेले .दुसऱ्या दिवशी ...अजून वाचा

4

आयुष्याचं सारं (भाग -4)

मला भेटलेली अनामिका " पहाटेचे साडेपाच वाजले होते . वातावरणात गारवा , अंगाला भिडणारी थंडी , रात्रभर जोरदार पाऊस कडाक्याची थंडी होती . वाटेतील पूल क्रॉस करत डांबरी रस्त्याचा कडेने जाताना रस्ता संपताच धुळीने माखलेल्या नागमोडी वळणाचीसुरुवात झाली . पायवाट चुकल्याची मला जाणीव झाली . " झाडांची गर्दी आणि सगळीकडे पसरलेली आल्हादायक शांतता , भयाण शुकशुकाट रातकिड्याचा किर्र किर्र आवाज कानात गुंजत होता आणि तेवढ्यातच एकाझाडाच्या कडेला पाठीमागे कुणाच्या तरी रडण्याचा आवाज आला . भरधाव रस्तागाठत झपाझप चालणारी माझी पाऊले धीरगंभीर आणि मंद झाली होती .अंधारात कुणीतरी रडत होते , तो स्त्रीचा आवाज होता . ...अजून वाचा

5

आयुष्याचं सारं (भाग-5)

सोशल मीडियाचा अतिरेकी वापरआजकाल लग्नाच्या पत्रिकाही व्हाट्सअप्पच्या माध्यमाने पोहचू लागल्याजग दूरच एवढं जवळ आलं की फेसबुकच्या माध्यमाने अनोळखी व्यक्तीसोबत करून आपण त्यांच्या भुलथापाचा बळीचा बकरा झालो .आज दहावीत शिकणारा मुलांपासून ते गृहिणी पर्यत आपला जास्तीत जास्तवेळ मोबाईल मध्ये घालवतात .सकाळी उठल्या उठल्या आपण ब्रश हातात न घेता मोबाइल हातात घेतोकुणाचे किती msg आलेत . कोणी काय पाठवलं . इतरांचे स्टेटस बघण्यापर्यंत आपला पूर्ण अर्धा तास आपण व्यर्थ घालवतो .आपल्याला ह्या वर्तुअल जगाने घेरलेले असते .महत्वाचं काहीच नसते आपण समजतो कॉलेजचे ग्रुप आहेत पणतिथे स्टडी वर कमी चर्चा आणि इतर विषयावर गप्पा करण्यात आपणमश्गुल होऊन जातो .तुमचं हे जग कॉपी ...अजून वाचा

6

आयुष्याचं सारं ( भाग -6)

दैवी शक्तीच्या आहारी जाऊन माणसाने स्वतःची बुद्धीतर गहाण ठेवलीच पण , आकाशातले ग्रह तारे ह्याचा माणसाच्या संसारीकजीवनाशी तीळ मात्र नसताना ते कुंडलीत कसे प्रवेश करतात हेच मला कळतं नाही . राशी ग्रह , जन्म कुंडली , राशी देवता ह्या साऱ्याचा प्रभाव माणसावर पडतंच नाही जशी निसर्गानी मानवाची निर्मिती केली . तशीच निर्मिती सर्व नैसर्गिक घटकांचीझाली आपण त्याकडे निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे हे समजून न बघता आध्यत्मिक कल्पना करतं बसने कितीमूर्खपणाचे लक्षण आहेत हे समजून येईलच .माणूस एखाद्या गुरु किंवा ढोंगी बाबाच्या आहारी जाऊन उलट स्वतःच नुकसान कसा करून घेतो हे मला माझ्या वैक्तिक जीवनातबघितलेल्या उधारणावरून स्पष्ट ...अजून वाचा

7

आयुष्याचं सारं ( भाग -7)

शारीरिक आकर्षणाचा बळीजगण्याच्या वर्तुळात प्रेम हे प्रत्येक सजीवाला बहाल केलेली अनमोल देणगी ....प्रेम म्हणजे जीवनाचं मर्म ! त्या वाटेवर निरंतर चालतं जावं असं सुखद कर्म ....जेव्हा एखादा मनुष्य आपल्या अतृप्त इच्छेसाठी एखाद्यावर प्राण घातक हल्ला करतो , तेव्हा त्याच्या माणुसकीवर संदेह निर्माण होतो .आपण त्याला क्रूर जनावर किंवा नरभक्षक म्हणून मोकळे होतो . तेव्हा , त्याला जबाबदार तो एकटा नसतोच तर संस्कृतीची थोरवी गाणारे , त्यांना बंधनात अडकविणारा हा समाज ही असतो .प्रेमापासून आपल्या अपत्यांना दूर ठेवणारे आईबाबा . त्यांना वाटतं आपला मुलगा किंवा मुलगी प्रेमात पडले म्हणजे तोंड काळे करून येणार की काय ?आणि तस चुकून माकून ...अजून वाचा

8

आयुष्याचं सारं ( भाग -8 )

पाऊसात भिजून विरलेलं नातं ..ढग गडगडायला सुरुवात झाली .... रेवती बाल्कनीत उभी राहून कॉफी पीत होती एवढ्यात तिचा फोन .आज बरेचं दिवसानंतर त्याचा फोन येताना पाहून रेवतीलाही ओशाळल्या सारखं झालं .... ती मनातच म्हणाली ," आली ना शेवटी माझी आठवण .... तू नाही राहू शकतं रे माझ्याविना ..."फोन उचलत विलंब न करता तिने कानाला लावला कॉफीचा घोट गिळत ती म्हणाली , " बोल ना आता .. "त्यावर जरा हळू स्वरातच तो म्हणाला , " मला तुला भेटायचं आहे आता .... " ती जरा भांबावलीच" आताचं भेटायचं आहे तुला ?? "" हो ..... का , तुला यायचं नाही ? ...अजून वाचा

9

आयुष्याचं सारं ( भाग -9)

हिंदू कोड बिल आणि भारतीय स्त्री .... भारतीय स्त्री अनेक वर्ष आणि आजही बघतो रूढी परंपरेच्या बंधनाने जोखण्डाने बांधलेली . आपली भारतीय संस्कृती म्हणजे पुरुषप्रधान . त्या पुरुषप्रधान संस्कृतीने तर स्त्रीला तिच्या हक्कापासून वंचित ठेवले . परंपरागत चाली नुसार आजही जन्माला येणाऱ्या नवजात नागरिकाला आपल्या नावासमोर वडिलांचे नाव लावण्याचा अधिकार पुरुषांतक संस्कृतीनेच दिला . स्त्री फक्त एक बाईमाणूस म्हणून जगते . खरं तर माझ्या दृष्टीने स्त्री ही अनंतकाळाची पत्नी आणि आई होण्याआधी ती एक जिता जागता माणूस आहे हा विचार समाजात रुजवणे श्रेष्ठ ठरेल . स्त्रीच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी आम्ही कितीही झगडलों तरी निरर्थक ठरेल जेव्हा पर्यंत स्त्री स्वतः ...अजून वाचा

10

आयुष्याचं सारं ( भाग -10)

कुठे शोधू रे मी तुला आता ??म्हणतात कल्पने पेक्षा वास्तव खूप भयंकर असते . कवी लेखकच तो असतो जो काल्पनिकतेला वास्तविकतेच वळण देतो . पण वास्तविकता किती भयाण असते तिथे भावनेच्या दरीत कोसळून वेदनांचा तांडव होतो ... मला सख्खा भाऊ नाही पण त्याच्या रूपात मला सख्खा भाऊ मिळाला होता . त्याची आणि माझी ओळख म्हणजे कवी विश्वात जगणारी दोन पाखरे होतो . कवितेच्या डहाळीवरून भावनांच्या हिंदोळ्यावर झुलणारी . ह्या लेखाच्या भावविश्वातून ओळख झाली तो माझ्या कविता लेख वाचून भरभरून दाद द्यायचा . आणि माझे विचार त्याला आवडू लागले . त्याला मी दादा म्हणावं भाऊ मानावं हे सारखं वाटायचं तो ...अजून वाचा

11

आयुष्याचं सारं ( भाग -11)

बौद्ध जीवन कर्म सिद्धांत .. माणूस हा आजच्या गतकाळाच्या आणि येणाऱ्या काळात जो काही असतो तो त्याच्या क्रमाने घडतो त्यांचे कुशल कर्म त्याला चांगल्या मार्गाने नेतात आणि त्याचे दुष्कृत्य त्याला वाम मार्गाने घेऊन जातात . बुद्धाचा धम्म हा धम्म आहे विशिष्ट असा धर्म नाही धर्माचं स्वरूप त्याला इतर धर्मानी दिलं असलं तरी बुद्धाने धम्म म्हणून बुद्ध धम्माची स्थापना केलीहोती . धम्म माणसामाणसातील भेदभाव नष्ट करीत असेल तरच धम्म होतो . बुद्ध जातिव्यवस्थेचा घोर विरोधक होता . त्याने स्वतःच्या धम्मात सर्व जातीधर्मातील उपासकांना आपला परिवाजर्क होण्याची परवानगी दिली .सिद्धार्थ क्षत्रिय राजा शाक्य कुळात जन्माला येऊन त्यांनी बुद्धत्वाची प्राप्ती झाल्यावर आपल्या ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय