Mrunmayichi Dayari book and story is written by Meenakshi Vaidya in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Mrunmayichi Dayari is also popular in सामाजिक कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
मृण्मयीची डायरी - कादंबरी
Meenakshi Vaidya
द्वारा
मराठी सामाजिक कथा
नमस्कार
वाचकांसाठी यावेळी मी वेगळ्या विषयावर कथा मालिका घेऊन आले आहे. हा वेगळा विषय वाचकांना आवडेल अशी आशा करते.माझं लिखाण आवडत असेल तर नक्की तुमच्या ओळखीच्या लोकांना पाठवा ही विनंती
धन्यवाद.
##मीनाक्षी वैद्य.
मृण्मयीची डायरी. भाग १ला
मृण्मयीला जाऊन पंधरा दिवस झाले होते तरी घरात सगळ्यांना तिची प्रकर्षानी आठवण येत होती. मृण्मयी हयात असताना एवढी आठवण आपल्याला कधीच कशी आली नाही याचं वैजू ला आश्चर्य वाटलं.
मृण्मयी खूपच संवेदनशील मनाची होती. हेही घरच्यांना माहिती नव्हतं तिच्यावर अनेक घातक प्रसंग आले.पण घरच्यांना ते कधीच कळले नाही.
ते सहन करताना ती बोलणच विसरली. याचीपण घरात कोणाकडून दखल घेतल्या गेली नाही. घरच्यांना यत् किंचीत ही तिच्यावर आलेल्या प्रसंगांची माहीती नव्हती. कशी असणार?
ती तशीही मितभाषी होती. स्वतःला व्यक्त करणं तिला जमत नसे. शेवटी शेवटी काही वर्ष ती व्यक्त व्हायची पण स्वतःशीच. तेच तिचं वागणं घरात सगळ्यांना खटकू लागलं.
तिच्या अश्या असंबद्ध बडबडण्याची घरातल्यांना काहीच तर्कसंगती लागतं नव्हती. त्यामुळे निष्कर्ष तरी काय काढणार?
नमस्कार वाचकांसाठी यावेळी मी वेगळ्या विषयावर कथा मालिका घेऊन आले आहे. हा वेगळा विषय वाचकांना आवडेल अशी आशा करते.माझं लिखाण आवडत असेल तर नक्की तुमच्या ओळखीच्या लोकांना पाठवा ही विनंती धन्यवाद. ##मीनाक्षी वैद्य. मृण्मयीची डायरी. भाग १ला मृण्मयीला जाऊन ...अजून वाचादिवस झाले होते तरी घरात सगळ्यांना तिची प्रकर्षानी आठवण येत होती. मृण्मयी हयात असताना एवढी आठवण आपल्याला कधीच कशी आली नाही याचं वैजू ला आश्चर्य वाटलं.मृण्मयी खूपच संवेदनशील मनाची होती. हेही घरच्यांना माहिती नव्हतं तिच्यावर अनेक घातक प्रसंग आले.पण घरच्यांना ते कधीच कळले नाही.ते सहन करताना ती बोलणच विसरली. याचीपण घरात कोणाकडून दखल घेतल्या गेली नाही. घरच्यांना यत् किंचीत ही
मृण्मयीची डायरी भाग २रा.मागील भागावरून पुढे…तारीख… १६/६/१९८८इतरांचं जाऊ दे आईनी पण कधी गंभीरपणे माझी दखल घेतली नाही. वैजुताई आणि सारंग दादा सारखं मलापण माझी मतं आहेत हे तिला कळतच नव्हतं.मला वाटायचं माझ्याजवळ आईनी येऊन बसाव.प्रेमानी डोक्यावरून हात फिरवावा.पण असं ...अजून वाचाझालं नाही.मग दादा,ताईंच्या डोक्यावरून कशी येता जाता हात फिरवायची. त्यांचा गालगुच्चा घ्यायची. माझ्यावेळी तीला हे आठवलं नाही कधी.आई जेव्हा दादा ताईचे लाड करायची तेव्हा ते मी आधाशासारखं माझ्या डोळ्यांनी पिऊन घ्यायचे.तारीख...१५/६/१९८८मला नेहमीच सगळेच मंदच समजत आले.मला ओरडून सांगावं वाटलं की मी मंद नाही. मी इतरांसारखी हसू शकते, रागाऊ शकते, बोलू शकते.मला सगळं येतं पण मला दादा ताई सारखं खूप बडबड
मृण्मयीची डायरी भाग ३रा तारीख...५/९/१९८८काल दादाचा फायनल ईयरचा निकाल लागला.तो प्रथम श्रेणीत प्रथम आला होता.सगळे खुप कौतुक करत होते त्यांचं. मीपण त्याचं अभिनंदन केलं तर माझ्याकडे लक्ष न देता आईला म्हणाला "आई ही मंद माझं अभिनंदन करतेय" आणि हसला.मी ...अजून वाचाकेल्यावर इतरांना थॅंक्यू म्हणतो तसं मला का म्हणाला नाही.मंद म्हणून का हसला.माझी कोणतीच गोष्ट दादाला का आवडत नाही. त्याला माझ्याशी बोलायला का आवडत नाही? मी तर त्याला त्रास होईल असं कधीच वागत नाही. त्याचे मीत्र आले की मी खोलीच्या बाहेरच येत नाही.कोणाला सांगू मनातलं कळतच नाही.आई बाबा दादा ताई सगळे आपल्याच कामात असतात. दादा आणि ताईला काही अडचण आली की
मृण्मयीची डायरी भाग ४था..मागील भागावरून पुढे….किती तरी वेळ वैजू डायरीकडे सुन्न नजरेनी बघत बसली होती. तिला वाटू लागलं एका मुग्ध निरागस मनाच्या जीवाला आपण खूप मोठ्ठी शिक्षा दिली.अशी शिक्षा देण्याचा आपल्याला काय अधिकार होता?आपल्या स्वप्नांच्या कळ्या वेचण्यासाठी आपण धडपड ...अजून वाचानं! तिची स्वप्नं तर खूपच छोटी होती.ती फुलवण्याचा तिला आपल्यासारखाच अधिकार होता. मी, आई, बाबा, सारंग सगळ्यांची जबाबदारी होती तिच्या स्वप्नांना ऊमलविण्यासाठी हवी ती मदत करायची. मदत सोडा आपण तिची स्वप्नंसुद्धा समजून घेतली नाही.तिची स्वप्नं या जगातील स्वप्नांपेक्षा वेगळी होती. निरागस होती. सच्ची होती. तिची स्वप्नं आपल्याला पेलवली नसती कदाचित.आपण नेहमीच जगाच्या वेगवान शर्यतीत दौडत होतो. या जगात निरागसतेला किंमत
मृण्मयीची डायरी भाग ५वामागील भागावरून पुढे…वैजू आत आली तर तिला सारंग रडताना दिसला.त्याला रडताना बघून वैजूच्या डोळ्यातून पुन्हा पाणी वाहू लागले.सारंग दोन्ही हातांनी डोकं पकडून जमीनीकडे बघत मुसमुसत होता.वैजूने सारंगजवळ जाउन त्याच्या पाठीवरून हात फिरवला.सारंगने वैजूकडे वर बघितलं तसं ...अजून वाचात्याला म्हणाली,"सारंग मला वाटतं आपण त्या काऊन्सलरला भेटाव.."" आता काय उपयोग भेटून?""नेमकं तिला काय झालं होतं हे तरी कळेल. तिला आई घेऊन गेली होती पण नंतर आपण कुठे काही विचारलं आईला? ऊलट मृण्मयीला काऊंन्सलरची गरज पडली यावरच आपण हसलो. खरच हसण्यासारखं होतं का काही? सारंग आपण असताना तिला काऊंन्सलरची गरज पडायला नको होती.""हो...खरय तुझं म्हणणं. आपण तिच्या प्रश्नांना किती सहजपणे