गीतारहस्या मधील कर्म या विषयावरील विचार सांगणे हा उद्देश आहे. हे अर्जुना, कर्मे न सोडताही तू कर्मबंध सोडशील अशी ही कर्मयोगातील बुद्धि म्हणजे ज्ञान तुला सांगतो. ज्ञानप्राप्ती नंतर निष्काम बुद्धीने कर्म करीत राहणे हाच पुरुषार्थ. कर्मयोग मार्गात एका जन्मात सिद्धि मिळाली नाही तरी ते कर्म पुढील जन्मात उपयोगी पडते व अखेर सद्गती मिळते. बुद्धि हा शब्द ज्ञान, समजूत, हेतू, वासना या अर्थाने वापरला गेला आहे. तसाचं व्यवसाय म्हणजेच कार्याचा निश्चय करणारे बुद्धिंद्रिय असाही अर्थ होतो. बुद्धि स्थिर नसल्याने निरनिराळ्या वासनांनी मन व्यापले जाऊन, स्वर्गप्राप्तीसाठी अमुक कर्म, पुत्र प्राप्ती साठी अमुक कर्म असे मनुष्य करू लागतो. परमेश्वराचे ज्ञान प्राप्त करून न घेता कर्म करणाऱ्यास, कर्माचे फल मिळाले तरी मोक्ष मिळत नाही. मोक्ष मिळवण्यासाठी बुद्धिंद्रिय स्थिर असले पाहिजे.

1

कर्म - गीतारहस्य - 1

कर्म . गीता रहस्य.गीतारहस्या मधील कर्म या विषयावरील विचार सांगणे हा उद्देश आहे.हे अर्जुना, कर्मे न सोडताही तू सोडशील अशी ही कर्मयोगातील बुद्धि म्हणजे ज्ञान तुला सांगतो.ज्ञानप्राप्ती नंतर निष्काम बुद्धीने कर्म करीत राहणे हाच पुरुषार्थ. कर्मयोग मार्गात एका जन्मात सिद्धि मिळाली नाही तरी ते कर्म पुढील जन्मात उपयोगी पडते व अखेर सद्गती मिळते.बुद्धि हा शब्द ज्ञान, समजूत, हेतू, वासना या अर्थाने वापरला गेला आहे. तसाचं व्यवसाय म्हणजेच कार्याचा निश्चय करणारे बुद्धिंद्रिय असाही अर्थ होतो. बुद्धि स्थिर नसल्याने निरनिराळ्या वासनांनी मन व्यापले जाऊन, स्वर्गप्राप्तीसाठी अमुक कर्म, पुत्र प्राप्ती साठी अमुक कर्म असे मनुष्य करू लागतो.परमेश्वराचे ज्ञान प्राप्त करून न ...अजून वाचा

2

कर्म - गीतारहस्य - 2

"कर्म- गीतारहस्य"गीतारहस्य हा ग्रंथ गीतेतील कर्मयोगाचे महत्व स्पष्ट करतो.कर्मयोगाच्या साधनेसाठी आवश्यक असलेल्या निःसंग व ब्रह्मनिष्ठ स्थितीची प्राप्ती कोणत्या साधनांद्वारे ते आता सांगितले आहे. मनात फलाशा न ठेवता जो आपली नेमून दिलेली कर्मे करतो, तोच खरा संन्यासी आणि कर्मयोगी समजावा. ज्याला संन्यास म्हणतात तोच कर्म योग समजावा कारण काम्यबुद्धीरुप फलाशेचा त्याग (संन्यास) केल्याशिवाय कोणीही कर्मयोगी होत नाही.साधनेच्या पहिल्या अवस्थेत कर्म हेच योगसिद्धीचे कारण बनते.कर्मयोगी आपली सर्व कर्मे शांतचित्ताने, कर्तव्य म्हणून, फळाशा न ठेवता करतो.अशा प्रकारे फळाशेचा त्याग करणारा मनुष्यच खरा संन्यासी आणि योगारूढ मानला जातो.प्रयत्नशील मनुष्यांसाठी फळाशेचा त्याग करून कर्मयोगाची साधना शक्य होते.मनुष्याने स्वतःच आपला उद्धार करावा, कारण आपणच आपले ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय