Bhatkanti - Aathvanichya gard ranatali - 19 books and stories free download online pdf in Marathi

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १९

" गुरुजी .... माझे आजोबा सांगायचे मला , त्यांच्या गावाच्या गोष्टी.... मोठ्ठ गाव होते, बाजूला दोन नद्या १२ महिने वाहत असायच्या. आजूबाजूला डोंगर... ", पूजा पुढे काही बोलणार तर गुरुजींनी मधेच तिचे वाक्य तोडलं आणि स्वतः बोलू लागले. " गावात मोठी मोठी झाडे.... सुखाने नांदलेले गाव... शेत जमिनींनी फुललेलं गाव... वाऱ्यावर डोलणारे गाव .... बरोबर ना " पूजा हरखून गेली.
" हो ... हो ... हेच .... तेच ते गावं.. तुम्हाला कस माहित ... हे असे माझे आजोबा वर्णन करायचे ... " ,
" आजोबा ... !! महाद्या.... हा..... महादेव नाव त्याच .... वाड्यातल्या महाद्याची नात का तू .... " गुरुजी आठवून आठवून बोलले.
" हो ... आजोबांचा वाडा होता , असे सांगायचे ते ... महादेवच नाव आजोबांचे.... बरोबर ओळखलं तुम्ही ... " पूजा किती आनंदात होती.
" महाद्या आणि मी ... लंगोटी यार .. एकत्रच शिकलो ... त्यांच्या वाड्याशेजारी आमचे घर होते... मोठा वाडा .... गावाच्या मधोमध ... असं डोंगरावर उभे राहील कि त्याचा वाडा पहिला दिसायचा आणि वाड्याच्या गच्चीवर गेले कि पूर्ण गाव ... शेतं दिसायची... " पूजा खाली मांडी घालून बसली.


" ते शहरात कसे बंगले असतात ... त्याही पेक्षा मोठा वाडा... वाड्यासमोर असं पसरलेलं अंगण... त्यात किती ती फुलझाडं .... बापरे !! तुझा आजोबा पैसेवाला होता हा .. " गुरुजी हसू लागले सांगताना.
"त्याच गावात निघालो आहोत आम्ही.... ते गाव बघायचे मला ... तो वाडा बघायचा आहे ... " पूजा आनंदात सांगत होती.
" शक्य नाही ते ... " ,
" का ? " ,
" बघ .... आम्ही गाव सोडलं तेव्हा मी आणि तुझा आजोबा ... १०-१२ वर्षांचे होतो. आता मी झालो ७५ वर्षाचा... म्हणजे जवळपास ६० वर्ष तरी झाली आम्हाला गाव सोडून.. काय राहीलं असेल तिथे आता... कशाला जाता तिथे... ",
" पण गुरुजी ... असं ऐकलं आहे मी ... कि पूर्वीचे बांधकाम मजबूत असते ... " संजना बोलली.
" हो ... असते मजबूत ... तेव्हा गावात मी तरी कोणते घर पावसात पडलेले पाहिले नव्हते... तरी इतकी वर्ष कोणी राहत नाही तिथे ... काय सांगू शकत नाही ना ... काही राहील असेल तिथे... " ,
" आजोबा .... i mean गुरुजी... इतके छान गाव... का सोडले तुम्ही... मस्त होते ना .... सोडायचे कशाला... " कादंबरीने अडखळत प्रश्न केला.


"त्या दोन नद्या होत्या ना ... त्यावर साऱ्या गावाचे पोट होते. एक वर्षी पाऊस खूप कमी पडला. आणि अचानक दोन्ही नद्यांचे पाणी कमी होऊ लागले. त्या वर्षी निभावले साऱ्यांचे. पण पुढल्या वर्षी तर झालंच नाही पाऊस. भरीस भर म्हणून दोन्ही नद्या एकदम गायब झाल्या. तेव्हाची जुनी लोकं बोलायची. नदी मार्ग बदलते नाहीतर पृथ्वीच्या पोटात जाते. तसेच झाले असेल काही. दोन वर्ष असाच भयंकर दुष्काळ पडला गावात. काहीच पिकलं नाही शेतात. पर्याय नव्हता. बरीच जनावरं , माणसं मेली. उरलेले होते ... ते सर्व हातात मिळेल ते आणि घेऊन जाता येईल असं घेऊन निघाले... सगळ्यांनीच गावं सोडला. " गुरुजी जुन्या आठवणी सांगत होते.
" सगळे या गावातच आले का ... " आकाशने विचारलं.
" नाही. ज्याला जी वाट आवडली तो त्या वाटेने गेला. हिचा आजोबा... त्याचे घरातले श्रीमंत होते. शहराकडे गेले. माझे बाबा , शिक्षकच होते. या गावात ओळख निघाली. राहिले इथे. बाकीचे माहित नाही. पण तुम्ही कशाला जाता परत तिथे... त्या महाद्याने पाठवले वाटते... आहे कसा आता तो ... " गुरुजी पूजाला विचारत होते.
" आजोबांना जाऊन ४ वर्ष झाली आता. " गुरुजींना वाईट वाटलं ... मित्रच शेवटी.
" छान होता महाद्या... त्याच्याच अंगणात खेळत राहायचो आम्ही सारे मित्र. मी तर कधी त्याच्याकडे जेवायलाही असायचो ..... " गुरुजी आठवणीत रमले. " ते गाव उभे तरी असेल का माहिती नाही... हरवून गेले ते गाव. कोणाला माहीतही नसेल असे कोणते गाव होते कधी. "
" आम्हाला पाहायचे आहे एकदा तरी .... आठवणीत ठेवायला. " आकाश बोलला. गुरुजी आठवू लागले .
" नक्की कुठे आहे ते सांगू शकत नाही. एवढ्या वर्षांनंतर त्याचा रस्ता लक्षात नाही आता. तरी हिचा आजोबा सांगायचा तसे गेलात तर ... गावाच्या बाजूला ३ डोंगर आहेत, ४ म्हणालात तरी चालेल. मधोमध गाव आहे ते. हे असे खाली जमिनीवरून चालत गेलात तर दिसणार नाही ते. या समोर डोंगर रांगा दिसतात ना ... तसे चालत गेलात तर दिसेल. डोंगरच्या मध्ये लपलेलं ,वसलेलं गाव. "

" चालेल गुरुजी ... आम्ही निघतो ... खूप खूप आभार !! "... पूजा ...
" एक सांगतो... ऐकून जा ... प्रवास सोप्पा नाही तो. तुम्हाला अश्या ठिकाणी जायचे आहे , जिथे कोणी जात नाही. काही लागली तरी मदत मिळणार नाही कोणाची. त्यात पावसाची सुरुवात. या भागात वादळे येतात वरचेवर. मी लहानपणी तशी वादळं अनुभवली आहेत. खडतर प्रवास आहे. " पूजा ते ऐकून उभी राहिली.
" गुरुजी , आता तर ठरवलं ना ... प्रवास तर करणारच पूर्ण... " निघाले सर्व . सुप्री यावेळेस आकाश सोबत चालत होती.
" मलाही या वेळेचा प्रवास कायमचा आठवणीत कैद करायचा आहे. " आकाश सुप्रीला बोलला. सुप्रीला खरंतर वाईट वाटलं. निव्वळ आपल्यासाठी त्याची आवड कायमची सोडणार आहे. असा विचार मनात आला आणि सुप्री जागच्या जागी थबकली. आकाश त्याच्याच धुंदीत पुढे चालत गेला. मागून संजना होतीच. तिनेच सुप्रीला सोबत घेतलं.


त्या गुरुजींनी सांगितल्या प्रमाणे , यांनी सुरुवातीला समोर असलेल्या पठाराकडे कूच केली . आकाश - पूजा सर्वात पुढे.
" चल डब्बू... पळायची शर्यत लावूया का .... आठवले का ... आधीच ... " पूजाने आठवण करून दिली.
" हो हो .. अशी सपाट माळरानं दिसली कि पळत जायचो... पहिला कोण पोहोचते त्यासाठी. " ,
" चल ... लावूया का शर्यत .... " पूजाने पुन्हा विचारलं.
" तयार !! १ .... २ .... ३ .... " म्हणत दोघेही पळत सुटले. पूजाच्या ग्रुपला या दोघांची सवय माहित होती. कादंबरी, सुप्री -संजना यांना सोडून.
" यांना काय वेड लागलं आहे का ... " कादंबरीने सुप्रीला विचारलं. " तो वेडाच आहे आधीपासून ... फक्त आता मी आहे सोबत त्याच्या .... इतकाच काय तो फरक... " सुप्रीच्या बोलण्यातले दुःख जाणवत होते. पूजा आणि आकाश धावत एका ठिकाणी पोहोचले. आकाश आधी पोहोचला आणि जागच्या जागी उड्या मारू लागला. अगदी लहान मुलासारखा ... केवढा तो आनंद झालेला त्याला. आकाशला तस हसताना पाहून सुप्रीला जुना आकाश आठवला. असाच हसायचा तो भटकंती करताना. त्याच ते असं हसणं ... गेल्या २ वर्षांनंतरचे असाव ना... शहरात असताना हसणे आणि आताचे हसणे, यात खूप फरक होता , कारण आता तो निसर्गात होता. सुप्रीने स्वतःलाच तो फरक समजावून टाकला.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश:

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED