T. V and small children books and stories free download online pdf in Marathi

टी. व्ही आणि लहान मुले

खरं सांगायचं झालं तर टी. व्ही हे दूरदर्शन खूप वर्षा पूर्वी प्रसारित झालेले आहे. सुरुवातीला लोक फक्त रेडिओवर बातम्या ऐकत असतं. सर्व जगातील माहिती त्यांना एका दूरदर्शन द्वारे मिळत असे. परंतु आताच्या काळात प्रत्येकाला घराघरात टी. व्ही उपलब्ध आहे. पूर्वी आपण बातम्या फक्त ऐकत होतो. पण आता टी. व्ही द्वारे कोणतीही बातमी चॅनल द्वारे सहज रित्या बघू शकतो. ते चॅनल म्हणजे ABP माझा IBN लोकमत zee 24 तास असे वेगवेगळ्या चॅनलवर बातम्या दाखवल्या जातात. तसेच देशावरती किती अतिरेखी यांनी हल्ला केला व मिलेक्ट्रिक वाले जसे आपल्या देशासाठी लढतात. ते कशा प्रकारे मृत्यूला सामोरे जाऊन ते आपला प्राण वाचवत असतात. स्वतःहा ते मृत्यू मुखी पडून ते आपल्या देशामध्ये अतिरेखी घुसू देत नाही हे फक्त आपल्याला ऐकण्यात आले होते. पण कधी आपण प्रत्यक्ष पाहिलेलं नव्हतं. ते आता टी. व्ही मुळे शक्य झाले आहे. तसेच शहरी भागामध्ये होणाऱ्या चोरी व होणारे बलात्कार तसेच स्त्रियांवर होणारे आत्याचार हे आपल्याला कदापि ही कळले नसते. ते जरी अत्याचार होत असले तरी ही ते आपल्या पर्यंत पोहचले नसते. टी. व्ही या माध्यमाद्वारे आपण देखील सावध झालो आहोत. कोणते ही दृश्य आपण सहज रित्या पाहू शकतो. ते फक्त टी. व्ही मुळे शक्य झाले आहे. टी. व्ही वर दाखविले जाणारे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम खरंच बघण्यासारखे असतात. मग मालिका असो,सिनेमा असो, किंवा रिऍलिटी शो, टी. व्ही वर दाखविले जाणाऱ्या कार्यक्रमातून आपण काय आचरणात घेतले पाहिजे आणि या कर्यक्रमातून काही ना काही तरी चांगला हेतू असतो. फक्त फरक इतकाच आहे कि आपल्याला काय घ्याच आहे आणि काय नाही हे समजले पाहिजे. आणि त्याचा उत्तम लाभ घेता आला पाहिजे. व त्यानुसार आपण आपलं ध्येय ठरवलं पाहिजे आपल्याला एखादे पुढे आयुष्यात काय करायचे आहे स्वतःचं ध्येय काय आहे पुढे काय करायच आहे हे जर ठरत नसेल तर अशी ही माध्यमे उपयोगी पडतात आणि काही बदल आपण आपल्या मध्ये केले पाहिजेत. आपल्या समाजामध्ये बहुतेक माणसं अशी आहेत कि त्याचा म्हणणं असं असतं कि टी. व्ही हे माध्यम मुलांवर वाईट परिणाम करते. मुलं अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. पण मला हे साफ चुकीचे वाटतं कारण एखादा मुलगा किंवा मुलगी टी. व्ही पाहत असेल किंवा कोणता कार्यक्रम पाहत असेल तर त्यांना त्यामध्ये काही तरी इंट्रेस असेल असं होऊ शकत त्यामध्ये त्याच कुठेतरी स्वप्न ध्येय लपलेले असेल आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल मग आपण असं तर नाही ना म्हणू शकत कि टी. व्ही मुळे मुलांवर वाईट परिणाम होतात. फरक इतकाच कि टी. व्ही पाहण्याला पण लिमिट असते 24 तास टी. व्ही च्या समोर राहणं चुकीचं आहे त्याने मुलांच्या डोळ्यावर परिणाम होऊ शकतो. खरं सांगायचं तर मुलांना जर आपल्या लाईफ मध्ये successful व्हायचं असेल तर ते काही ना काही तरी नक्कीच प्रयत्न करतील. तसेच कुणाचं स्वप्न असेल सिंगर बनाव, अँक्टर बनाव, डान्सर बनाव, अँकर बनाव मग ते टी. व्ही च्या माध्यमातून ज्ञान मिळणार असेल तर टी. व्ही का वाईट आहे मग. त्याच्यातून त्यांना योग्य ते मिळणार ना! आणि त्यानुसार आपल्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करणार. तर मला असं वाटतं कि टी. व्ही मुळे कोणते ही वाईट परिणाम होत नाही. उलट मुलांमध्ये काही तरी करून दाखवण्याची काही तरी बनण्याची जिद्द निर्माण होते आणि हे मी स्वतः पाहिलं आहे. म्हणून मला वाटतं अशा मुला- मुलींना घरातील वरिष्ट्यानी त्यांना सपोर्ट केला पाहिजे. आणि मुलांना चांगल्या वाटचाली चा मार्ग दाखवला पाहिजे. आपल्या समाजात अशी बरीचशी माणसं आहेत जर आपण एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला कि मागून पाय ओढायला तयारच असतात. तसेच असं ही म्हटलं जात कि मुलगी किंवा मुलगा दिवसभर टी. व्ही च पाहत असतो काही काम करत नाही. अभ्यास करत नाही. मान्य आहे आपल्याला जर आपलं ध्येय आपलं स्वप्न पूर्ण करायच असेल उंच शिखर आपल्याला गाठायचं असेल तर अभ्यास ही तेवढाच महत्वाचा आहे. आणि आपल्याला कोणी तरी काही तरी बोलतंय म्हणून आपण एक पाऊल मागे नाही यायचं तर एक पाऊल पुढे जायचं आणि यशस्वी व्हायचं असेल तर जिद्दीने जाऊन दाखवायचं जे बोलणारे मागे खेचणारे आहेत त्यांची तोंड बंद केली पाहिजे. सध्याच्या काळात टी. व्ही आणि मुलांचा संबंध खूपच जवळचा झाला आहे. जसे कि टी. व्ही आणि आपण जवळचे मित्रच आहोत ! लहान मुलांना तर कार्टून शिवाय जमतच नाही. पण ते बघताना सुद्धा ती किती खुश असतात ना? तसेच टी. व्ही वर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या खूप महत्वाच्या असतात. दररोज जगामध्ये काय घडत, आहे काय बदल होतात, किती खूण होतात हे सर्व आपण घरबसल्या पाहू शकतो. ते फक्त एका टी. व्ही मुळे खरंच खूप फायदा होतो या टी. व्ही चा आणि ते ही चांगल्यासाठी आपण जर चांगल्या कामासाठी त्याचा वापर केला तर चांगलाच परिणाम होणार ना? वाईट कामासाठी वापर केला तर वाईट होणार ! म्हणून जे चांगलं आहे तेच घेतलं पाहिजे. जे चांगलं आहे ते घेतलं तर पुढे चांगलंच होणार आणि जर वाईट मर्गाने गेलात तर ते वाईटच होणार. पण आपल्याला फक्त जेवढ काही चांगलं ज्ञान घेता येईल तेवढच घ्यायचं मग कोणी ही बोलू शकत नाही. कि टी. व्ही चा मुलांवर वाईट परिणाम होतो. जे आपल्याला आवडत ज्याच्यापासून आपल्याला आंनद मिळतो ते आपण करावं पण ते नेहमी चांगलाच असलं पाहिजे. टी. व्ही च्या माध्यमातून कोणत्याही वाईट मार्गाला जाऊ नये आणि जर वाईट मार्गाला गेलात तर नक्कीच आपल्याला लोक बोलणार कि हा टी. व्ही चा परिणाम आहे.50 % आपण नेहमी चांगल बनण्याचा आणि चांगलं करण्याचा प्रयत्न करूया ! मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, तसेच सिंधुताई सकपाळ असे जे सिनेमा दाखवले जातात त्यामधून शिवाजी राजे कसे घडले. त्यांनी त्या काळी ग्रॅज्युवेशन पण केल नाही तरी देखील ते इतकं मोठ - मोठी कार्य त्यांनी पार पाडली. अशी मोठ - मोठी कार्य जर ते करू शकतात तर आपण का नाही. हा प्रश्न आपण स्वतःला स्वतःजवळ विचारला पाहिजे? शिवाजी महाराजासारखं घडलात नाही पण घडण्याचा प्रयत्न नक्कीच करू या......... टी. व्ही हे जितके देशासाठी चागलं माध्यम आहे तसेच ते वाईट सुद्धा आहे. टी. व्ही वरती जे सिनेमे दाखवले जातात. त्यामधून जर चांगले घेतले तर वाईट कृत्ये आपल्या हातून होणार नाही. टी. व्ही मुळे अनेक मुले व्यक्ती व्यसनाच्या आहारी जातात. व तसेच टी. व्ही वरती जे कार्यक्रम दाखवले जातात. म्हणजेच असे काही सिन दाखवले जातात ते म्हणजे प्रेमप्रकरण, बलात्कार त्यामधून ते वाईट कृत्ये करण्यास भाग पडतात. व वाईट मार्गाला जातात. टी. व्ही जास्त वेळ बघतल्यामुळे डोळ्यांवर परिणाम होतो. व लहान वयामध्येच चष्मा लागण्याची शक्यता या जगामध्ये मोठया प्रमाणात वाढली आहे. मुलांनी जास्त वेळ टी. व्ही बघितल्याने त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो. व अभ्यासावर लक्ष लागत नाही. त्यांना लहानपणा पासून सवय झाली कि त्यांना पुढे कॉलेज करणे, करियर करणे, अवघड होते. त्यांचं लक्ष अभ्यासामध्ये व त्यांच्या करियर मध्ये लक्ष लागत नाही. Success तर आपल्याला मिळणारच आहे फक्त प्रयत्न करत राहूया....... आणि टी. व्ही चा नेहमी चांगलाच वापर करा. जेणेकरून आपल्या लाईफ मध्ये चांगलाच बदल होईल.... आणि टी. व्ही ला ही दोष लागणार नाही. तिचा काहीच दोष नसतो. कारण कोणता ही सिनेमा मध्ये जे व्यसन करणारे व्यक्ती दाखविले जातात. पण टी. व्ही वर छोट्या अक्षरामध्ये (धूम्रपान करणे से कॅन्सर होता है ) असं लिहिलेलं असतं म्हणा माणसाचेच दोष त्याला कोण काय करणार, पण आपण स्वतःपासून सुरुवात करूया.....! आणि नेहमी चांगला विचार करूनच पुढे आयुष्याची वाटचाल करूया.......! विशाखा ऋषिकेश मोरे (विलास सावंत ) ( दापोली भोपण पंधेरी ) 9137853889

इतर रसदार पर्याय